संताप

एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. ‘केलास सत्यानाश?’ असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली. काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. ‘बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार’ असं ती त्यांना विचारत राहिली. तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही. त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्‍या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, ‘बाबा, लव्ह यू’. त्या मुलीच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी आत्महत्या केली. 
बोध :
त्यामुले संताप हा माणसाला कुठेही घेउन जातो . कुठलीही गोष्ट पूर्णपणे विचार करुनच करावी त्यातच खरी कसोटी असते .

गंधा (सुगंधा) आणि राजा दोघं कितीतरी वेळ नुसते एकमेकांकडे पाहत होते. ते एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असले तरी प्रत्यक्ष एकमेकांसमोर प्रथमच आले होते. ते एकमेकांना नुसते ओळखतच नसून त्यांनी सर्वार्थाने एकमेकांना जाणून घेतले होते. एकमेकांच्या स्वभावातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहित झाल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष एकमेकांसमोर येताच त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते. ते एवढे स्तब्ध होते की जणू दोन-दोन तिन-तिन पानांची मेल करणारे ते आपणच का? अशी क्षणभर त्यांना शंका यावी. शेवटी त्यानेच पुढाकार घेवून सुरवात केली,


                 '' ट्रॅफिकमधे अडकलो होतो म्हणून उशीर झाला.... ग    ''

                      '' मी तर साडेचार पासूनच तूझी वाट पाहत आहे...''  गंधा  म्हणाली.

                       '' पण तू तर पाचची वेळ दिली होतीस'' ... राजा म्हणाला.


फक्त सुरवात करण्याचाच अवकाश, आता ते एकमेकांना चांगले मोकळे बोलू लागले. मग मनमुराद पणे बोलणे सुरु झाले. म्हणजेच गप्पा सुरु झाल्यात. 
बोलत बोलताच  ते हळू हळू बीचच्या रेतीवर समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने चालू लागले. चालता चालता केव्हा त्यांचे हात आपसूकच एकदूसऱ्यांच्या हातात गुंफले, त्यांना कळलंच नाही. कितीतरी वेळ हातात हात घालून ते बीचवर फिरत होते. सुर्यास्त होवून गेला होता आणि आता अंधारही पडायला लागला होता. मधेच अचानक थबकून, गंभीर होवून विवेक म्हणाला,.......


                         '' गंधा ... एक गोष्ट विचारू?'' 

                        तिने डोळ्यांनीच होकार दिला.

माझ्याशी लग्न करशील?'' त्याने सरळच तिला विचारले.....

तेव्हा गंधा काय बोलणार होती........... 

त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती एक क्षण गोंधळून गेली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीतून सावरताच तिने काही न बोलता लाजून खाली मान घातली.


अरे............ राजा मी अजुन तसा काही विचार नाही केलाय रे ...( मनातील विचार) 

                   राजच हृदय आता जोरजोराने धडधडायला लागलं होतं.  
    
                      आपण मनाचा हिय्या करुन हा प्रश्न तर विचारला...

                           पण ती 'हो' म्हणेल की 'नाही'?...




                         तो तिच्या उत्तराची प्रतिक्षा करु लागला.

                      आपण हा प्रश्न विचारायला जरा घाईच तर नाही ना केली?...

                                ती जर 'नाही' म्हणाली तर?...

                  त्याच्या डोक्यात नाना शंका डोकावू लागल्या.

                           थोड्या वेळाने ती म्हणाली, 

                        '' चला आपल्याला निघायला पाहिजे..'' 

            तिने बोलायला सुरवात केली तेव्हा पुन्हा त्याचे हृदय धडधडायला लागले होते...

                       पण हे काय तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते...

    पण तो एक पीएचडी चा विद्यार्थी होता. कोणत्याही प्रश्नाचा छडा लावणे त्याच्या रक्तातच होते.

             '' गंधा ... तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..'' त्याने तिला हटकले.

        '' चल मी तुला सोडून येते'' ती पुन्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला टाळत म्हणाली.

                  पण तोही काही कमी नव्हता.

                  '' अजून तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस''

ती लाजेने चूर होत होती. तिची मान खाली झूकलेली होती आणि तिचा गोरा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. ती आपल्या भावना लपविण्यासाठी पायाच्या अंगठ्याने जमीन कुरेदू लागली.


                     '' मी थोडीच नाही म्हणाले'' ती कशीबशी खाली मान ठेवूनच म्हणाली. 

आपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडले याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते.राजाचा  आतापर्यंत भांड्यात पडलेला जीव आता कुठे सावरला होता. त्याला इतका आनंद झाला होता की त्याला तो कसा साजरा करावा काही सुचत नव्हते. त्याने न राहवून तिला प्रेमाने आपल्या घट्ट मिठीत ओढून घेवून उचलले....

टिप: वरील कथानक हे श्री बाबासाहेब लोखंडे ह्याच्या जवालिक ह्या पुस्तकातील आहे
मला ते कथानक खुपच आवडले .म्हणून मी थोडक्यात ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हला आवडल असेल अशी मी आशा करतो ..

अघटित

दुपारची वेळ साधारणात दीड वाजले असावेत. ऊन नुसतं भणभणत होत. एखादं भयानक स्वप्न किंवा भयानक दृश्य पाहून घाम फुटावा तसा अंगातून घाम फुटत होता. अगदी अंगाच्या लाह्या झाल्या होत्या. तसाच अंगानं भिजलेल्या घामानं वर तळपत्या सूर्यानं माझ्या शर्टाचं ओलं बारदान झाल होतं. अन तशातच अंगाचा घाम पुसतच रस्त्याने लगबगीने चाललो होतो. शेवटी त्या उन्हाच्या झळा असह्य झाल्यामुळे कुठंतरी जरा बसावं या जाणीवेने आजूबाजूला पाहात मी पुढे चालत होतो. इतक्यांत एक दुकानाच्या कोपऱ्यात एक कठडा दिसला. तो ही खास बसण्याकरताच बनविला असावा तसा वाटत होता. म्हणूनच मग मी त्यावर जाऊन बसलो, हातातील फाईल बाजूला ठेवत मी त्या दुकानाच्या बंद शटरकडे पाहिले तर त्यावर रविवार बंद असं लिहिलं होतं. परंतु आज तर बुधवार, मग आज दुकान बंद असे? असा विचार करतच मी दुकानाच्या वरच्या बाजूला लटकाविलेल्या पाटीकडे पाहिलं तर तिच्यावर लिहिलं होतं हंसराज स्टोर्स, वेळ ७ ते १ व ३ ते ९ तेव्हा कुठे मला दुकान बंद का ? या प्रश्नाचे उत्तर सापडले. तसा माझा लहानपणापासूनच असा स्वभाव की कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर कोणत्याही मार्गाने ते शोधून काढायचेच, तेव्हाच कुठे चैन पडायचा अन्यथा जेवणाचेही भान राहात नसे.
आधीच साईटवर वैतागलो म्हणून जेवण करून फेरफटका मारण्याच्या उद्देशाने व ज्या भागात साईट होती त्या विभागाचा आढावा घेण्याच्या उद्देशान मी फिरत होतो. त्यामुळे बसल्या बसल्याच मनात इकडचे तिकडचे विचार घोळू लागले. मी बसलो होता त्याच्या बाजूलाच कुणीतरी खाली अंगावर ओढून झोपले होतं. भिकारी समजून मीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. परंतु त्याच्या कपड्यावरून तरी तो भिकारी नसल्याचे जाणवत होतं. पुन्हा मनात विचार आला. कदाचितत्या दुकानातील नोकर किंवा कामगार असावा. अशाच मनात विचार असलाचा व सर्व काही शांत वातावरण पाहता इथ पुढील काही क्षणात काही अघटीत घडेल यांची यत्किंचींतही कल्पना मला नव्हती. त्यामुळे मीही माझ्याचं तंदरीत होतो. त्यात जेवणात भात खाल्ल्यामुळे तर डोळ्यावर अगदी झापड येत होती. त्यातच बाजूलाच झाड असल्यामुळे थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. आणि मी विचार करता करताच डोळे शांतपणे मिटून त्या सतब्ध शांततेचा आनंद घेत होतो.
इतक्यात दोघे तेथे आले व माझ्या बाजूलाच उभे राहून एकमेकांशी बोलू लागले. अरे अजून वेळ आहे, चल तीनच्या शोला जाऊया, तसा दुसरा उद्गारला , कुठे? कोणत्या चित्रपटाला ? तिकीट भेटेल का? पहिल्याने मग उत्तर दिले, फेम ऍडलॅबला चल पाहू भेटेला जा कोणता तो! मग गाडी घेऊया का? तसा दुसरा म्हणाला, कशाला उगाच यार, असे त्या दोघांमध्ये संवाद चालू असतानाच एक धिप्पाड पुरुष त्या ठिकाणी आला. अंगात सफेत शर्ट, खाकी पँन्ट, लाल बुट व डोळ्यावर गॉगल.. आणि आल्या आल्याच त्याने त्या पहिल्या व्यक्तीला विचारले, काय रे ? कशाला गह्री आला होतो ? आलो होतो काम होतं माझं, का तुला काय करायचयं? असं उद्धटपणे म्हणत तो पहिली व्यक्ती गुर्मीत आला होता. तशी त्या धिप्पाड पुरुषाने त्याच्या एक जोरात कानशिलातच लावली. तसा पाच मिनिटापूर्वी त्याच्या सोबत चित्रपट पाहायला जाणारा दुसरा व्यक्ती चार पूट लांब सरला व उलट प्रश्न विचारायच्या आतच दुसरी एक थोबाडीत लगावून तो धिप्पाड पुरुष म्हणाला, काय लल्लू समजला काय? साल्या हिंमत कशी काय झाली माझ्या बहिणीकडे पाहण्याची ? तसा तो धाडकन येऊन माझ्या जवळच पडला तसा माझ्या काळजाचा ठोका वाढला व माझे काळीज धाड धाड करू लागले. मी माझी फाईल उचलण्याची घाई करीत खाली वाकलॊ तसा त्या दोघांच्या झटापटीत ती पहिली व्यक्ती पुन्हा येऊन खाली झोपलेल्या त्या माणसाच्याच अंगावर पडला, तसा तो किंचाळला. हे इतक्या क्षणार्धात घडले की, मी फाईल उचलताच बाजूला सरलो व लगबगीनं बाजूला जमलेल्या बघ्यामध्ये उभा राहिलो. झोपलेली ती व्यक्ती माझ्याच बाजूला येऊन उभी राहिली. परंतु चादर तिथेच राहिल्यामुळे तो कावरा बावरा झाला होता. मी आजूबाजूस नजर फिरवली असता, माझ्या लक्षाटा आले की, मार खाणाऱ्याचा मित्र ही तिथून गायब झाला होता. मला त्याचेच वाईट वाटले. कारण आम्ही नव्हे परंतु त्याच्या मित्रने तरी अशा वेळी त्याला साथ द्यायला हवी होती.
मनातल्या मनात मी जितक्या वेगाने विचार करीत होतो तितक्याच वेगाने त्यांची हाणामारी चालली होती. अगदी हिंदी सिनेमासारखी. मार खाणारी व्यक्तीसुद्धा आता उलट मारत होती. इतक्यात एक वृद्ध व्यक्ती व कॉलेजकुमारी तरुणी त्या ठिकाणी आले व त्या व्यक्तीला पाहताचक्षणी ती तरुणी ओरडली, हाच तो दादा…हाच! काय रे तूच आला होतास ना ? असे म्हणत म्हणतच ती सॅन्डलने त्याला मारू लागली. तसी ती वृद्ध व्यक्तीही त्यास जमेल तसे हात उगारून मारू लागली. मार खाणारी व्यक्ती आता अक्षरशः एक पडली होती. हे पाहून मग बघ्यांपैकी काही तरुण त्या तरुणीला मदत करण्याच्या हेतूने त्या पहिल्या व्यक्तीस मारू लागले. आता मात्र खाणारा एक व मारणारे अनेक होते.
गर्दी हळूहळू वाढू लागली व ट्रॅफिकही जाम झाली. मग ती तेथे थांबलेल्या बसमधील एक तरुणीकडे पाहू लागले. तिचा चेहरा खूपच लोभसवाणी दिसत होता. परंतु तीही हाणामारीच पाहात होती. तिला मी पाहतोय याकडे तिचं किंचितही लक्ष नव्हतं. त्यामुळे मीही तिला न्याहाळत होतो. इतक्यात ती एवढ्या जोरात किंचाळली की माझ्याबरोबर जमलेल्या अजून काही तरुणांनाही तिने आपल्याकडे वेधून घेतलं. तिने एक भयानक दृश्य पाहिलं होतं. त्यामुळे आमच्या सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. पाहतो तर काय? त्या ठिकाणी खून झाला होता. तोही डोळ्यादेखत. असलं काही पाहण्याचीसवय नसल्याने अंगाचा थरकाप उडाला. पाय लटपट कापू लागले, हातातील धरलेली फाईल हातातून केव्हा निसटली कळलचं नाही. अंगावर रक्ताचे शिंतोडे उडाले. मी पुरता घाबरलो. आता उगीच या फंदात फसणारच आता कुठे करिअरला सुरुवात होतेय तर आपलं कसं होणार? असे अनेक विचार व शंका येऊ लागल्या. त्यातच मी मागे सरलो आणि रस्त्याच्याकडेला लोकांसमवेत उभा राहिलो. मार खाणाऱ्या त्या एकट्या व्यत्कीने स्वतःला सावरत खिशातून सुरा काढून त्या तरुणीच्या पोटावर दोन वार केले होते आणि पाहता पाहताच या धिप्पाड पुरुषावर देखील दोन-चार सपासप वार केले. तसा तो देखील त्या तरुणीच्या बाजूलाच जाऊन पडला आणि त्याचा शर्टवर सरकल्यामुळे त्याने घातलेल्या पोलीसचा पट्ट सर्वांनी पाहिला. तो इन्स्पेक्टर होता आणि तिथे एका इन्स्पेक्टर हल्ला झाला होता.
आता मात्र मी पुरता घाबरलो आणि गर्दीतून बाहेर पडायच्या उद्देशाने मागे फिरलो तसा कठड्यावरुन खालीच पडलो. उठून पाहतो तर निःशब्द शांतता. खाली झोपलेली व्यक्ती आता घोरत होती. कदाचित मगाशी आलेले ते दोन मित्र तीनच्या शोला जाऊन बसले होते. आजूबाजूला कुणीही नव्हते. पावसात भिजल्यासारखा अंगातला शर्ट भिजला होता. काळीज धडधड करत होत. मग मी मनातच खजिल झालो अन स्वतःशीच उद्गारलो, बर झालं. हे स्वप्न होतं ते !!

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी, 
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली 
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे.. 
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता. 
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला. 
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला. 
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला. 
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन... 
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. ..... 
continue.....


ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.

१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली. 
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला. 
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर. 
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला. 
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति. 
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल. 


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे, 
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,

ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.'' म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?'' ''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.'' म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!
वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

संकल्प करा : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.


राजा आणि कवी

    पृथ्वीराज चौहान हा दिल्लीच्या तख्ताचा शेवटचा हिंदू राजा. तो महापराक्रमी व कुशल धनुर्धर होता. चंद वरदायी हा त्याच्याच दरबारातील एक अतिशय प्रतिभावंत कवी होता. त्यानच 'पृथ्वीराज रासो' हे काव्यचरित्र लिहिले. शहाबुद्दीन घोरीने भारतावर सतरा वेळा आक्रमण केले. त्यापैकी सोळा वेळा पृथ्वीराजाने त्याचा पराभव केला. मात्र सतराव्या वेळी घोरीने पृथ्वीराजाचा पराभव केला. त्याला कैद करून त्याचे डोळेही काढले. चंद वरदायीला फार वाईट वाटले. तो पृथ्वीराजाला भेटण्यासाठी म्हणून शहाबुद्दीन घोरीकडे गेला. तेथे त्याने आपली काव्यप्रतिभा दाखवून घोरीवर चांगली छाप पाडली. घोरीशी बोलता-बोलता त्याने पृथ्वीराजाच्या शब्दवेधी बाणकौशल्याची माहिती दिली. शहाबुद्दीन घोरीलाही उत्सुकता लागून राहिली. त्याने पृथ्वीराजाच्या धनुर्विद्येची परीक्षा आपल्या दरबारात घेण्याचे ठरविले. दरबारात आपल्या आसनाखालीच 'आवाज' केला जाईल, अशी त्याने व्यवस्था केली. त्या आवाजाला लक्ष्य करून पृथ्वीराज बाण सोडणार होता. मात्र त्या आधी चंद कविरायने एक दोहा सादर केला. त्या दोहय़ामध्ये पृथ्वीराज चौहानला सूचित करणारा एक इशारा होता. पृथ्वीराजाला तो 'इशारा' कळायला वेळ लागला नाही. ठरल्याप्रमाणे लक्ष्यस्थानावर आवाज होताच पृथ्वीराजानं अचूक बाण मारला. तो नेमका शहाबुद्दीन घोरीच्या छातीत घुसून तो मरण पावला. त्यामुळे दरबारात एकच खळबळ उडाली. सैनिक त्या दोघांनाही पकडायला धावले; परंतु दोघांनाही शत्रूच्या तावडीत सापडायचे नव्हते. असं म्हणतात की, तत्क्षणीच पृथ्वीराज चौहान व चंद वरदायी यांनी परस्परांना ठार मारून आपली जीवनयात्रा संपविली. राजा आणि कवीने परस्परांवरील आपल्या मैत्रिप्रेमाची अशी परिपूर्ती केली होती.


With Lots Of Love
Sachin Haldankar.



ब्रेकींग न्युज 








पैशाशिवाय काहीच नसतं. पण पैसा आला म्हणजे सगळं मिळतंच, असही काही नसतं. माणूस जितका वर चढत जातो तितके त्याचे प्रश्न वाढत जातात आणि त्याला तडजोड करणं अवघड होत जातं. पैशाशिवाय त्याला होणारा मनस्ताप आणि त्रास, खुप पैसे आल्यानंतर खरं तर कमी व्हायला हवा. 

पण असं होत नाही. 
नाहीतर एसी मर्सिडिज बसुन घरी चाललेला भावेश इतका अस्वस्थ दिसलाच नसता. खच्चुन भरलेल्या बसमधुन, एकमेकांच्या पायावर उभं राहीलेली, ती घामेजलेली लोकं जितकी वैतागलेली असतात, तितकाच तो ही चिडचिडला होता. 

एसी शरीर थंड करु शकते, मन नाही. रस्त्यावर मध्येच येणा-या लोकांना विनाकारण शिव्या देत तो घरी पोहचला तेंव्हा तो खुप थकला होता. मानसिक थकवा हा शाररीक थकव्यापेक्षा जास्त त्रासदायक असतो. त्यावर औषधही घेता येत नाही. 
भावेश घरी पोहचला तेंव्हा रात्रीचे सुमारे ११.३० झाले होते आणि नेत्रा, त्याची बायको, जेवण वगैरे आटपुन मस्तपैकी टिव्ही बघत बसली होती. कुठल्याही सिरियलपेक्षा जास्तच मनोरंजन करेल असा कार्यक्रम तिनी लावला होता. ती बातम्या बघत होती. कुठल्यातरी न्युज Channel वर ब्रेकींग न्युज लागली होती. बिहार जवळच्या एका खेड्यात एका बाईला ती मागच्या जन्मीची नागीण आहे असं वाटतय, अशी ती न्युज होती. ती बाई तिच्या मागच्या जन्मातल्या सगळ्या खाणाखुणा सांगत होती आणि रिपोर्टर जगातल आठवं आश्चर्य मिळाल्यासारखं दिवसभर तिच्या मागेमागे हिडुंन ती माहिती गोळा करत होता. मग ओघाओघानी तिच्या नव-याचा इंटरव्ह्यु... सासुनी दिलेल्या शिव्या... गावक-यांच्या प्रतिक्रिया... ह्याच बरोबर कुठल्यातरी हिंदी पिक्चरमधले नाग-नागीणीचे सीन्स आणि मागे सतत पुंगी वाजत असल्याच म्युझीक... अशी खुप कष्ट घेऊन ही न्युज बनवली होती. 

इतक्या उशीरा आल्यानंतर भावेश जेउनच यायचा त्यामुळे नेत्रा निवांत टिव्ही बघत बसली होती. पण आज भावेश इतकाच वैतागला होता की तिनी ते Channel बदलणंच पसंत केलं. तसही एकच न्युज इतक्या वेळेला लावली जाते की ती दुस-या दिवशी सुद्धा तिचं न्युज बघु शकत होती. भावेशसाठी तिनी Channel बदलंल पण त्याचा फारसा ऊपयोग झाला नाही कारण दुस-या ठिकाणीही एक ब्रेकींग न्युजच लागली होती. कुठेतरी पाच पायाचा कुत्रा सापडला होता आणि तो कुत्रा दैवी आहे अशी ती बातमी होती. नेत्रानी मग ३-४ Channels बदलुन पाहिली पण तिथं सास-बहु च्या सिरियल्स लागल्या होत्या आणि ते पहाणं ह्या पेक्षाही भयानक होतं. मध्येच कुठेतरी पुन्हा एक ब्रेकींग न्युज झळकुन गेली. ह्यावेळेसची न्युज परग्रहावरच्या मनुष्यवस्तीविषयी होती. 

"मुर्ख असतात लोकं... काय वाट्टेल ते दाखवलं तरी बघत बसतात." भावेश म्हणाला. 

भावेश कधीच सिरियल्स, सिनेमा ह्या असल्या फंदात नसायचा पण त्याला न्युजचा काहिच प्रोब्लेम नव्हता. खरं तर तो स्वत:च एक न्युज Channel चा मालक होता. भावेशच्या बोलण्यावर नेत्रा मात्र काहीच बोलली नाही. भावेश आता कसलाही संवाद साधायच्या पलिकडे आहे हे तिला माहित होतं. ह्या क्षणी त्याच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नव्हता. शांतपणे तिनी टिव्ही बंद केला आणि ती झोपायला निघाली.

"तु पण ह्या असल्या बातम्या बघतेस म्हणजे कमाल आहे" तो पुढे म्हणाला.

नेत्रा वळली आणि म्हणाली, "तुला हे कुणी सांगितलं की मी बातम्या बघत होते ? न्युज Channel मी बातम्यांसाठी नाही तर एंटरटेनमेंट्साठी लावलं होतं. कुठल्याही सिरियल किंवा पिक्चरपेक्षा जास्त मनोरंजन करतात ती. तसही बातम्या देणारी Channels आता राहिलीत कुठे ?"

" माइंड ईट ! " भावेश म्हणाला. "तु एका न्युज Channel च्या CMD शी बोलतीयेस."

नेत्रानी खाली ठेवलेला रिमोट उचलला आणि त्यावर भावेशचं Channel लावलं. त्यावर कुठल्यातरी चौकात एका ट्रफिक पोलीसनी ५० रु. ची लाच घेतल्याची न्युज होती. 

ती म्हणाली, " तु ह्याला न्युज म्हणतोयेस का ? असलीच तरी ती सकाळपासुन ४० वेळा दाखवली आहे. तुला खरंच वाटतं भावेश की लोक बातम्यांसाठी बातम्या बघतात ? अशी माणसं तुला १०% पण मिळणार नाहीत. इथं पाच दिवस पाणी येणार नाहीये ह्या बातमीपेक्षा पाच पायाचा कुत्रा ही बातमी जास्त बघितली जाते, कारण दिवसभर थकल्यानंतर पुन्हा फक्त प्रोब्लेम्स बघण्यात कुणालाही इंटरेस्ट नसतो. लोक मुर्खं आहेत म्हणुनच आपलं Channel चालु आहे. तुला बातम्या दाखवायच्यात तर दाखव, पण तुझ्या ह्या बातम्यात मला तरी कुठे बातमी दिसत नाहीये आणि त्यात एंटरटेनमेंट सुद्धा नाहीये !
पण हे सगळं मी तुला का सांगतीये ? तुला हे जास्त माहितीये...... ! भावेश, काय झालय....?"

ह्यावर भावेश काहीच बोलला नाही. तो एक पक्का बिझनेसमेन होता आणि त्यालाही लोकांच्या प्रोब्लेम्सचं काही सोयरसुतंक नव्ह्तं. नेत्रा जे काही बोलली ते सगळं खरंच होतं. गेल्या काही दिवसात त्याच्या Channel चा TRP बराच खाली गेला होता. कारण त्यात कुठेही बातमी नव्हती आणि एंटरटेनमेंट सुद्धा ! 

तो काहीच बोलत नाहीये हे बघुन ती म्हणाली, "मला कळतय रे, सद्धया खुप लोड आहे तुला. कामाचा ताण खुप वाढलाय आणि त्यात ही भरमसाठ न्युज Channels . पण मला खात्री आहे तु नक्की बाहेर पडशील ह्यातुन. तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे माझा... If things are not happening then you will make it happen ! "

आपण उगीचंच चिडचिड करतोय हे भावेशला जाणवलं. "Thanks." तो म्हणाला. 

नेत्रा झोपायला गेली पण भावेश जागाच होता. खुप थकुनही त्याला झोप येत नव्हती. नेत्राचं ’you will make it happen ’ हे वाक्य त्याच्या कानात घुमत राहीलं आणि पुढं काय करायचं हे त्यानी ठरवुनही टाकलं. सगळं काम संपवुन तो उठला तेंव्हा रात्रीचे २.३० वाजले होते. घड्याळाकडे पाहुनही त्यानी आपला मोबाईल उचलला आणि त्याच्या चारही News Reporter ना एक SMS केला.
"उद्या रविवार असुनही आपण भेटतोय. Office वर सकाळी १० वाजता. No excuses." 

ह्यानंतर कुणी न येण्याचं धाडस करु शकणारंच नव्हतं. भावेशला अजुनही झोप येत नव्ह्ती, पण निदान तो शांत होता. त्याला खात्री होती जे काही त्यानी ठरवलय त्यानंतर त्याला ब-याच ब्रेकींग न्युज मिळणार होत्या....!




सकाळी ०९.३० लाच चारही जण... म्हणजे अनन्या, स्वप्नील, सुमंत आणि कबीर... सगळेच Conference Room मध्ये आपापल्या जागेवर ब-याच तणावात बसले होते. एक तर ते का जमलेत हे कोणालाही माहित नव्हतं आणि त्यात प्रत्येकाच्या समोर २ पाकीटं ठेवली होती, त्यात काय असेल ह्याचा अंदाज लावता येत नव्हता. अर्थात ते उघडुन बघायची हिंमत कोणातच नव्ह्ती. विशेषत: कालच्या SMS नंतर...! 

भावेश बरोबर १० च्या ठोक्याला Office मध्ये आला. वातावरण तंग होतच. उगाचंच वातावरण निर्मिती न करत बसता, भावेश सरळ मुद्दयावर आला.
" अनन्या, ते पहिलं पाकीट उघड आणि बघ काय आहे त्यात. "

अनन्यानी ते पाकीट उघडलं आणि सुन्नच झाली कारण त्यात तिचंच रेझिग्नेशन लेटर होतं. त्यावर फक्त कुठलिही तारीख टाकली नव्ह्ती. हे ऐकताच, कबीर सोडून, सगळ्यांनी लगेच आपापली पाकीटं उघडली आणि स्वत:चंच रेझिग्नेशन लेटर पाहुन सगळेच थंड झाले. कबीर शांतपणे मोबाईलशी चाळा करत बसला होता. तो Channel चा स्टार रिपोर्टर होता आणि त्याला खात्री होती की ह्या मागे नक्कीच काहीतरी वेगळा हेतु असणार. 

कबीरचा हा थंडपणा भावेशला अगदिच आवडला नव्हता. त्याच्या हातातुन मोबाईल काढुन घेऊन कच-यात टाकावा असं भावेशला वाटलं, पण आपल्याला काहीच वाटलं नाहीये असं दाखवत तो म्हणाला, "आता ते दुसरं पाकीट उघडा." सगळ्यांनी पाकीट उघडलं. त्यात पैसे होते. 

"२०,००० आहेत. तुम्हाला मी कामावरुन कमी करत नाहीये. खरं तर ह्या वेळेला सगळ्यात जास्त गरज आहे Channel ला तुमची. पण गेले काही दिवस आपलं Channel तोट्यात चाललय आणि ह्याच कारण आहे तुम्ही आणत असलेल्या टाकाऊ बातम्या. आपला TRP खुप खाली गेलाय आणि कोणीही आपलं Channel लावत नाहीये. बातम्या शोधुन आणणं तुमचं काम आहे. शोधा... नसेल मिळत तर घडवा. मला माझं Channel पुन्हा एक नंबर वर पहायचय. हे पैसे वापरा, त्याचं काहीही करा पण मला ब्रेकींग न्युज आणुन द्या. मी पुन्हा सांगतो... काहीही करा.
तुमच्या ब्रेकींग न्युज नी Channel ला फायदा झाला तर इन्क्रिमेंट, प्रमोशन आणि बोनस सगळंच त्या प्रमाणात मिळेल. पण जमत नसेल तर हा तुमचा शेवटचा पगार समजा. माझ्या टेबल वर उद्यापासुन रोज तुमच्या पैकी कोणाचा ना कोणाचा ब्रेकींग न्युज चा व्हिडीओ असेल किंवा तुमचं रेझिग्नेशन. तुम्ही निघु शकता...! "


सगळे आपापली पाकीटं घेउन बाहेर पडले आणि भावेश एकटाच उरला. त्याला माहित होतं की स्वत:ची कातडी वाचवायला आणि पोट भरायला माणुस कोणत्याही थराला जाऊ शकतो. आता त्याला ब्रेकींग न्युज ची चिंता नव्ह्ती. त्याला खात्री होती की रोज सकाळी त्याच्या टेबलवर एक तरी ब्रेकींग न्युज असणार आहे.


भावेशचा अंदाज फारसा चुक नव्हता. कारण अनन्या सारखी एक सिन्सीयर मुलगी सुदधा न्युज कशी बनवता येईल ह्याचाच विचार करत होती. तिला माहीत होतं की ब्रेकींग न्युज अशी एका आठवड्यात मिळ्णं अवघड आहे, पण तयार करणं नाही. 

पत्रकारीतेची मुल्य बाजुला ठेऊन ती विचार करायला लागली. राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे सगळेच प्रकार इतके गुळगुळीत झाले होते की त्यावर ब्रेकींग न्युज बनणं अवघडंच होतं. हिंदी नटनट्या आणि त्यांच्या विषयी बातम्या देणारी इतकी Channels होती की त्यातही काही दम नव्हता. काहीही न घडता खुप काही घडलय असं दाखवणारी काहीतरी बातमी तिला हवी होती.

आणि अशी एक गोष्ट होती..... अफवा... ! मग तिनी थोडी लांबची एक शाळा निवडली आणि तिथं Bomb ठेवला असल्याचा फोन केला. तिच्या अंदाजानुसार थोडी गडबड उडणार होती, ज्याला मसाला लावुन न्युज करता आली असती. 

सुरवात तिला वाटली तशीच झाली पण नंतर जे घडलं ते तिच्या डोक्यातही आलं नव्हतं आणि तिच्या हातातही राहीलं नाही. फोन आल्या आल्या मुख्याध्यापकांनी पोलीसांना बोलावलं आणि Bomb शोधणारं Sqad ही ! 

खरं तर ते Bomb न मिळाल्यामुळे परत गेले असतेही पण त्याच वेळेला कुठेतरी फटाक्यासारखा मोठा आवाज झाला आणि सगळं चित्रच बदललं. जीवाच्या भितीनं शिक्षकांनीच पळायला सुरवात केली तिथं छोट्यांची काय चुक ? काहीही न कळल्यामुळे मुलं वेड्यासार्खी धावायला लागली. चेंगराचेंगरीत कित्येक मुलं जखमी झाली. ती छोटी मुल पळुन तरी कुठे पळणार होती ? बिचारी रस्त्यावर येऊन थांबली आणि रडायलाच लागली. दरम्यान बाहेरही खुप गोंधळ झाला, कारण रस्त्यावर कोणालाच काही माहित नव्हतं. मग अफवांवर अफवा पसरल्या आणि परिस्थीती सगळ्यांच्याच हाताबाहेर गेली. 

मग पालकांचे लोंढेच्या लोंढे शाळेकडे लोटले. आपापलं मुल त्या गराड्यात शोधणं केवळ अशक्यच होतं. मुलांचे अतोनात हाल झाले. ती शाळा ह्या प्रकारात खुप बदनाम झाली. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांवर कारवाई तर अटळंच होती. 

हा सगळा प्रकार अनन्याला इच्छा नसताना बघावा आणि Camera त Shoot करावा लागला. स्वत:च्या मुर्खपणामुळे तीला खुप अपराधी वाटंत होतं. ह्या सगळ्याला तीच तर जवाबदार होती. तिचं हे Live Shooting फक्त भावेशच्या Channel वर दिसत होतं कारण इतर कोणी अजुन पोहचलंच नव्हतं. तिची नोकरी वाचली होती पण त्यासाठी खुप लोकांना किंमत मोजावी लागली होती.

पण भावेश खुष होता. त्याला हवं ते मिळालं होतं. आणि अशा अजुन किमान तीन तरी न्युज बाकी होत्या. 

आज सगळे जण आपापल्या जागेवर बसुन होते. कालच्या प्रकारानंतर अनन्यातर सुन्नच झाली होती. काहीच न्युज हाताशी नसल्यामुळे सुमंत ब-याच तणावात होता. पण न्युज न मिळुनही कबीर मात्र शांत होता. स्वत:च्या मोबाईलमध्ये तो पुन्हा एकदा हरवुन गेला होता. म्हणायला आरामात होता फक्त स्वप्नील कारण भावेशच्या टेबलवर आज जी ब्रेकींग न्युज होती, ती स्वप्नीलची होती. 

भावेशनी व्हिडीओ लावला आणि पहिले कही क्षण कोणालाच काही कळालं नाही. बहुदा कुठेतरी लपवुन ठेवलेला Camera असावा... थोडयाच वेळात लक्षात आलं की ते एक चर्च आहे. ही, पैसा काय काय करु शकतो ह्याची कमाल होती. स्वप्नीलनी चक्क चर्चमधल्या कन्फेशन्स Box मध्येच Camera लपवला होता. खरं तर तिथं येऊन कन्फेशन्स देणा-या लोकांचा हा विश्वासघात होता कारण प्रत्यक्ष चर्चमधले पाद्रीसुद्धा कन्फेशन्स देणा-याचा चेहरा बघु शकत नाहीत. इथ तर अब्रुच टांगणीला लावण्याचा प्रकार होता.

स्वप्नीलच्या ह्या कल्पनेवर भावेश जाम खुष झाला होता. पहिल्यांदा काही साधी, सरळ कन्फेशन्स होती. धंद्यातली फसवाफसवी, सांसारीक कुरबुरी आणि कुरघोड्या, नव-याशी प्रतारणा, बायकोचा छळ, चोरी वगैरेच्याच सगळ्या कबुली. 

"तु ह्याला ब्रेकींग न्युज म्हणतोयेस ?" भावेश म्हणाला.
" Wait Boss... & watch this one...........! " हे स्वप्नील इतक्याच स्टाईलमध्ये म्हणाला की सगळेच सावरुन बसले. 

आता साधारण चाळीशीचा एक माणूस आत आला. कन्फेशन्स Box जवळ येऊन तो काहीच क्षण उभा राहिला आणि चक्क रडायलाच लागला. म्हणाला, "Forgive me, Father. देवाकडे माझ्यासाठी क्षमा मागा. मी गुन्हेगार आहे. मी पाप केलय. " थोडं सावरल्यावर तो पुढे बोलायला लागला, 
" मी एक Doctor आहे. शहरातल्या सगळ्यात मोठ्या आणि खुप नावाजलेल्या Hospital मध्ये मी काम करतो. इतके दिवस मी त्यांना सामील होतो, पण आता नाही सहन होत आहे मला. मी अपराधी आहेच आणि ह्याची शिक्षापण भोगेनच. त्याआधि मला माझे सगळे गुन्हे कबुल करायचेत.
सुरवातीला Hospital मध्ये होणारे Frauds हे फक्त रुग्णांकडुन जास्त पैसे उकळण्यापर्यंतच मर्यादीत होते. पण हळुहळु आमची हाव वाढायला लागली. मग Hospital मधलं आधिच वापरलं गेलेलं आणि खरं तर destroy च करायला हवं असं सामान आम्ही पुन्हा पुन्हा वापरायला लागलो. अनेक लोकांच्या जखमा स्वच्छ करुन खराब झालेले आणि नंतर नष्ट करायचे कापुस आम्ही बाहेर विकायला लागलो. हाच कापुस धुवुन, पुन्हा ब्लिच करुन Hospital ला विकला जायचा. खुप पैसे मिळायचे ह्यात. सलाईनच्या बाटल्या, सिरिंज, औषधं सगळं expiry date उलटुन गेलेलं राजरोसपणे वापरुन आम्ही लाखो करोडो कमावले. हे सगळं करताना ब-याचदा लोकांच्या जीवाशी खेळ होतोय हे पण आम्हाला कळत होतं. 

आता तर गेले काही महिने ते खुप भयानक प्रकार करताहेत. आधि पैशासाठी आम्ही जे करायचो त्यात कोणाचा तरी जीव जायचा पण आता पैसे कमावण्यासाठी ते लोकांना मारताहेत. कसलीही साधी तक्रार घेऊन कोणी आलं की पहिल्यांदा त्यांना घाबरवुन खुप Tests करायला सांगीतलं जातं. त्यात बरेच पैसे कमावल्यानंतर आलेल्या Report मध्ये हवे तसे changes केले जातात आणि अजुन घाबरवलं जातं. इतक्या मोठ्या Hospital मधुनच Report आल्यानी कोणी विश्वास न ठेवायचा प्रश्नच येत नाही. मग Treatment साठी म्हणुन admit करुन घेतलं जातं आणि औषधांच्या नावाखाली तो पर्यंत slow poison दिलं जातं जो पर्यंत Critical Condition होत नाही. 
एकदा Critical Condition झाली की नातेवाईकांच्या सह्या घेऊन Operation केलं जातं, ज्यात रोगी वाचत नाही किंवा कोमात जातो. तोपर्यंत त्याच्या शरीरातले कित्येक भाग काढुन आधिच विकलेले असतात. ह्यात इतके पैसे आहेत की Postmortem चे Reports manage करणं फारसं अवघड काम नाहीये. रोज असे लोक मरताहेत पण हजारो लोकात काही लोक मेले तर काही फरक पडत नाही. थोडी आरडाओरड झाली तरी पैशानी दाबता येतात प्रकरणं !

मी ह्यातुन बाहेर पडायचं ठरवलय. मी त्यांना नाही थांबवु शकत पण ते ही मला थांबवु शकत नाहीत. मला जगायचा आधिकार नाही. मी...." इतकं बोलुन Doctor निघुन गेले होते. ती व्हिडीओ क्लीप संपली तरी कोणी काही बोलुच शकलं नाही. मग ब-याच वेळानी भावेश म्हणाला, 
" Hey.... Good Job, स्वप्नील... Wonderful... & rest you leave it to me !"

पुढे काय करायचें त्याला माहित होतं. त्यानी काही फोन केले आणि संध्याकाळ पर्यंत सगळ शहर पेटलं होतं. Hospital मध्ये खुपच गोंधळ झाला. त्या Doctor नी तर आत्महत्याच केली. काही लोक ह्यात अडकले तर काही पैशाच्या जोरावर पुन्हा सुटले. पण भावेशला त्याचं किंवा लोकांच्या आयुष्याचं काही घेणं देणं नव्ह्तंच. त्याला हवी तशी एक मोठ्ठी ब्रेकींग न्युज मिळाली होती. ....आणि ही न्युज फक्त भावेशच्या Channel वर होती. एका दिवसात त्याचं Channel पुन्हा Top ला आलं होतं. 

आणि सुमंत पुढच्या ब्रेकींग न्युजवर काम करत होता.

सुमंतनी सकाळ सकाळीच सगळ्यांना फोन केले आणि आज १०.०० ऎवजी भावेशसकट सगळे ६.३० वाजताच Office वर जमले. कदाचीत सुमंतकडे जो व्हिडीओ होता, तो १० वाजल्यानंतर पहायला खुप उशिर झाला असता. 

व्हिडीओ कदाचीत अंधारात घेतला गेला असावा. एक कोणीतरी माणुस, जो नीट ओळखताही येत नव्हता, हातात काहीतरी घेउन चालत होता. अचानक त्या माणसानी हातातली ती वस्तु टाकली आणि तो पळूनही गेला. ती वस्तु म्हणजे हार होता... तो सुद्धा चपलांचा आणि त्या माणसानी तो टाकला होता एका पुतळ्यावर. लोकांच्या भावना दुखवायला पुतळ्याची विटंबना करणं ही गोष्ट पुरेशी होती. 

व्हिडीओ इथंच संपला होता. ह्या धक्क्यातुन कोणीच बाहेर पडलं नव्हतं. भावेश पण नाही. तो म्हणाला, 
"सुमंत... Are you NUTS ? ह्यात किती मोठी रीस्क होती कळतय तुला ? कोणीही... जर कोणीही तुला पकडलं असतं तर मारुन टाकलं असतं. पण Still... Great.. Great Job...! I appreaciate !! 
आता सगळेच Channels ही न्युज दाखवायला सुरवात करतील. पण हा व्हिडीओ फक्त आपल्याकडेच आहे. अजुन थोडा वेळ जाऊ दे मग आपण हा व्हिडीओ बाहेर काढु." 

ह्या प्रकरणावरुन, भावेश सोडुन जर कोणी हसत होता तर तो कबीर होता. तो भावेशला म्हणाला, " पण सर, हा व्हिडीओ आपल्याला कसा मिळाला, हा issue झाला तर ? " 

आपल्यापर्यंत तो कसाही येऊ शकतो. कोणीही समाजकंटक किवा आपला हितशत्रु हे काम करु शकतो. आणि तसही हे आता इतकं पेटंत जाईल की कोणीही नाही येत विचारायला. ....वा सुमंत ! तु तर पुढच्या आठवड्याचीच ब्रेकींग न्युज दिलीस. हे कसं पेटवायचं ते मी बघतो... ". 

आणि खरंच ही बातमी थोडी भडक करुन दाखवण्यात आली. व्हिडीओमधला तो माणुस कोण ह्यावर इतकं राजकारण झालं की वातावरण पेटंतंच गेलं आणि ह्याचा फायदा फक्त भावेशलाच झाला. अनेक Channels नी ही बातमी जरी दाखवली असली तरी तो मुळ व्हिडीओ फक्त भावेश कडे होता. 


एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे प्रकरण जास्तच चिघळलं. भावना दुखावला गेलेला तो विशिष्ट वर्ग रस्त्यावर आला आणि पण संयमीत पद्धतीनं निषेध करत होता. पण न जाणो कुठुन एक दगड आला आणि मग त्या मुक-मोर्चाचं दंगलीत रुपांतर झालं. मग लुटालुट, जाळपोळ आणि हाहाकारच माजला. त्यानंतर पोलीसांचा हस्तक्षेप आणि त्यांना अनिच्छेनं करायला लागलेला गोळीबार.. सगळंच दुर्दैवी होतं.

ह्या सगळ्याचा आनंद होणारा एकमेव प्राणी होता... भावेश ! इतकं होऊनही त्याची भूक भागली नव्हती. तो कबीरच्या न्युजची वाट बघत होता. पण ह्यासाठी त्याला उद्या सकाळपर्यंत वाट बघावी लागणार होती.

पण कबीर तर केंव्हाचा तयार होता... अगदी आत्तासुद्धा ! 

ब्रेकींग न्युज ची आज कबीरची पाळी होती आणि ती पहायला भावेश स्वत:च खुप excite झाला होता. त्याला खात्री होती की ती सगळ्यात जबरदस्त असणार आहे. कबीरचं थंड डोकं, त्याचा आत्मविश्वास, त्याची धडाडी सगळच इतकं जबरदस्त होतं की इतर सगळ्यांहुन त्याची न्युज वेगळीच असणारच होती.

आश्चर्य म्हणजे भावेश office मध्ये आला तरी कबीरचा पत्ताच नव्हता. पण कबीर स्वत: आला नसला तरी त्यानी तो ब्रेकींग न्युजचा व्हिडीओ पोहचवायची व्यवस्था केली होती. नुसता व्हिडीओच नाही तर त्यासोबत एक पाकीट पण होतं. भावेशनी पहिल्यांदा पाकीट उघडलं. त्यात कबीरचं एक पत्र होत.

"सर, माझं Resignation Letter सही करुन परत केलय. I hope, मी ते २०,००० रुपये परत करण्याचा संबंध नाहीये. पण तरिही खाल्ल्या मिठाला मी जागणार आहे. एक शेवटची ब्रेकींग न्युज तुमच्या Channel साठी ठेऊन जातोय. जरुर दाखवा. अर्थात तुम्ही ती नाही दाखवली तरी बाकीची Chaneels नक्की दाखवतीलच म्हणा. 
Thanks for everything..... आणखिन एक... Cassette ची एक copy कदाचीत एव्हाना पोलीसांकडेही पोहचली असेल. तुम्ही हे सगळं पाहेपर्यंत ते पोहचतीलच तुमच्यापर्यंत..."

भावेशला Resignation, शेवटची ब्रेकींग न्युज... पोलीस.... ह्या धक्क्यातुन सावरायला थोडा वेळच लागला. मग त्यानी ती Video Cassette Play केली आणि तो जागेवरच कोसळला. 

त्याच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. कारण समोर टिव्हीवर तो स्वत:लाच बघत होता. तो म्हणत होता...

" अनन्या, ते पहिलं Envelop उघड आणि बघ काय आहे त्यात. ........
.........बातम्या शोधुन आणणं तुमचं काम आहे. शोधा... नसेल मिळत तर घडवा. If things are not happening then Make it happen ! मला माझं Channel पुन्हा एक नंबर वर पहायचय. हे पैसे वापरा, त्याचं काहीही करा पण मला ब्रेकींग न्युज आणुन द्या. I repeat काहीही करा.
.... " Hey.... Good Job, स्वप्नील... Wonderful... & rest you leave it to me !"
......" व्वा... सुमंत... तु तर पुढच्या २ आठवड्यांची ब्रेकींग न्युज दिलीस. हे कसं पेटवायचं मी बघतो... Great.. Great Job... "


थोडक्यात... रविवारच्या Meeeting पासुन अगदी कालपर्यंतच्या सगळ्या Meetings कबीरनी मोबाईलवर Record केल्या होत्या. कबीरचा मोबाईल चाळा भावेशला खुप महागात गेला होता. कबीरनी हे सगळं Record तर केलं होतंच पण ते चक्क दुस-या Channels ला विकलं पण होतं. भावेश सावरायच्या आधि Office वर पोलीस पोहचले होते. म्हणजे त्यांना ती Video Cassette मिळाली होती. भावेश, त्याची टीम आणि त्याचं Channel सगळं संपलं होतं. 

आज त्याचं Channel सोडुन सगळ्यांच्या Channel वर दोन शब्द मोठ्ठया अक्षरात झळकत होते.... 

ब्रेकींग न्युज ! 


लेखक  - धुंद रवी ( सौजन्य आणि आभार )



ठाणे अंमलदार नेहमीप्रमाणे वर्दी नोंदवून घेण्याचे काम करीत असतात. हवालदार, वसूलदार मंडळी आदल्या दिवशीचा हिशेब लावत असतात. तेवढय़ात एक चष्माधारी, मिशाळ व्यक्ती ठाण्यात शिरते आणि ठाणे अंमलदाराच्या टेबलासमोर जाऊन उभी राहाते.
‘मला तक्रार नोंदवायची आहे’, चष्मेधारी व्यक्ती सांगते. पुणेकर मंडळी तांबडय़ा दिव्याकडे दुर्लक्ष करीत ज्या सहजतेने आपली दुचाकी पुढे नेतात त्याहीपेक्षा जास्त सहजतेने ठाणे अंमलदार त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतात. दरम्यान, या माणसाला कुठेतरी पाहिले आहे, अशी कुजबूज हवालदार मंडळींमध्ये चालू होते. बराच वेळ डोकं खाजवल्यावर या व्यक्तीला वांद्रय़ाच्याच कलानगर परिसरात पाहिले आहे, यावर तमाम हवालदारांचे एकमत होते.
‘मला तक्रार नोंदवायची आहे.’ ठाणे अंमलदाराच्या दुर्लक्षामुळे ‘चष्मेधारी’चा आवाज चढतो.
‘नोंदवा की, आम्ही त्यासाठीच बसलोय इथं. बोला कसली तक्रार नोंदवायचीय’, ठाणे अंमलदार खास ‘पोलिसी’ आवाज


काढतो.
‘आमच्या लेकीचं अपहरण झालंय’, चष्मेधारी सांगतो.
‘अपहरण, शिरीयस भानगड दिसते आहे’, असं म्हणत ठाणे अंमलदार खुर्चीत अंमळ सावरून बसतो. सकाळी सकाळी अपहरणासारखी तक्रार चालून आलेली. तक्रार करणारा माणूस कपडय़ालत्त्यावरून बरा दिसतो आहे. त्यामुळे हवालदार, वसूलदार अशा सगळ्यांत मिळून ‘अर्धी पेटी’ तरी सुटायला हरकत नाही, असा हिशेब ठाणे अंमलदाराच्या मनात चमकून जातात.
‘अरे, साहेबांसाठी ‘थंडा’ मागव’, खूश झालेले ठाणे अंमलदार आज्ञा देतात.
‘बोला साहेब, काय नाव आहे मुलीचं’, ठा.अं.
‘मराठी’, चष्मेधारी.
पोलीस खात्याला आवश्यक असलेली माहिती ठा.अं. विचारून घेतात.
‘तुमचा कुणावर संशय’, ठा.अं.
‘आमच्या देवऋषानं सांगितलंय, मुलीला शिवाजी पार्क परिसरात नेलं आहे’, चष्मेधारी.
‘अरेच्चा!’ ठा.अं.
‘ज्या बंगल्यात तिला ठेवलंय त्या बंगल्याचं नाव ‘कृ’पासून सुरू होते आणि बंगल्यातलं शेवटचं अक्षर ‘ज’ आहे, असंही सांगितलंय देवऋषानं’, चष्मेधारी. ‘मग जाऊ या शिवाजी पार्कला. बघू या बंगला सापडतोय का’, इतका वेळ कडेला उभा राहून ठा.अं. आणि चष्मेधारी यांच्यातला संवाद ऐकणारा हवालदार तोंड उघडतो.
चष्मेधारी, त्याचे दोनचार सल्लागार आणि हवालदार मंडळी त्वरेने शिवाजी पार्ककडे कूच करतात. वाटेत मुलीच्या ‘प्रिं.’काकांचं घर लागतं. अक्षयतृतीयेच्या राहिलेल्या पुरणपोळ्या खाऊन ‘प्रिं.’काका निवांत झोपलेले असतात. चष्मेधारींचे शाब्दिक ठोकाठोक करणारे सल्लागार ‘प्रिं.’ना उठवतात. दुपारच्या झोपेसारखा ‘कोहिनूर’ सोडावा लागल्यामुळे ‘प्रिं.’ चडफडत उठतात. शिवाजी पार्कमध्ये इकडेतिकडे हिंडल्यावर एका सल्लागाराला ‘कृष्णकुंज’ बंगला दिसतो.
‘साहेब, आपल्याला पाहिजे तो हाच बंगला आहे बहुतेक!’ सल्लागार चष्माधारींच्या कानात कुजबुजतात.
चष्माधारींनाही आपल्याला हवा असलेला बंगला हाच, याची खात्री पटते. ते सल्लागार आणि हवालदारांना घेऊन बंगल्यात घुसतात. कडी ठोठावतात. दरवाजा उघडायला त्यांची कन्या ‘मराठी’च येते.
तिला पाहून चष्माधारी आणि त्यांच्या सल्लागारांचे चेहरे उजळतात.
‘बघा, हवालदार साहेब, मी म्हणत होतो ना, आमची मुलगी इथंच असणार म्हणून! अरे, बघता काय चला तिला घेऊन’, चष्माधारी.
‘खबरदार, अंगाला कुणी हात लावला तर! हवालदारसाहेब, मला कुणी पळवून आणलेलं नाही. मी स्वत:हून ते घर सोडलंय आणि काकाच्या घरी राहायला आलेय.’ खडय़ा आवाजातले मराठीचे बोल ऐकून चष्माधारी व त्याचे सल्लागार वरमतात.
‘पण मुली, असं वडिलांना न सांगता घर सोडून का आलीस? काकाकडं चाललेय असं सांगून तरी यायचंस’, हवालदार.
‘तुम्हाला काय सांगू हवालदारसाहेब, मला ‘फिक्स्ड डिपॉझिट’मध्ये ठेवून नुसतं व्याज खाताहेत हे. आपल्या लेकीला काय हवंय हे कधी विचारतसुद्धा नाहीत. घराबाहेरसुद्धा पडू देत नव्हते मला. हे कमी की काय म्हणून आमच्या शेजारी ‘यूपी’तलं एक कुटुंब आलंय राहायला, त्यांना ‘हिंदी’ नावाची मुलगी आहे. तिचा वाढदिवस ते साजरा करायचे, पण माझ्या वाढदिवसाला एक फुगा नाही की मेणबत्ती नाही. माझ्याकडे हे लक्ष देत नाहीत म्हणून मी काकाकडं राहायला आलेय. हा काका सध्यातरी माझं कौतुक करतोय. बघूया. तोही हय़ांच्यासारखा वागला तर हे घरही सोडावं लागेल मला.’
‘मराठी’चे रोखठोक बोलणे ऐकून चष्माधारी व त्याचे सल्लागार गप्प होतात आणि मुकाटपणे निघून जातात.

एकदा एक सावली, माणसावर रागावली.
सावली म्हणाली, ''मी आता चालली.''
पण.. सावलीला काही जाताच येईना.
सावलीला काही पळताच येईना.
कारण...
सावलीचे पाय, माणसाच्या पायात.
माणसाचे पाय, सावलीच्या पायावर.

सावली माणसाशी गप्पा मारु लागली.

सावली : सोड ना रे मला आता. सतत मी तुमच्या पायाशी पडलेली असते. किंवा कुठे ना कुठे पडत तरी असते.
ताट मानेने काही मला चालता येत नाही.

माणूस : अगं, आमची मान म्हणजेच तुझी मान!
तुझी का आहे वेगळी मान?

सावली : हे बघ, उगाच दुसरंच काहीबाही बोलू नकोस.
प्रश्न फक्त मानेचा नाही.
प्रश्न मानाचा आहे!
कळलं ना..?

माणूस : हं...समजलं.

सावली: मंग मला काही किंमतच नाही का रे?
कुणाचिही सावली काळीच पडते.
त्यामुळे माझ्याकडे पाहून काही ठरवताच येत नाही.
काही अंदाज करता येत नाही.
मी ही अशी!
(असं बोलतांना सावली अधिकच काळी पडली.)

माणूस : अगं, म्हणजे तुला काही कल्पनाच नाही तर....
तू आमच्यापेक्षाच काय पण सगळयापेक्षा खूप खूप मोठी आहेस.
तू जिथं पोहचतेस आणि तू जे काम करतेस, ते जगात कुणालाही शक्य नाही.
आणि...तुझ्यावरून केलेल्या अंदाजामुळे तर सारं जगच बदलून गेलं.

९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.आता नंबर दाबून दाबून मेंदूला थकवा आला आहे.)
'हॅलो वेलकम टु एअरटेल. हाउ कॅन आय हेल्प यु?'
(अरे चांडाळा,मराठीसाठी इतके आकडे मूर्ख म्हणून दाबले का लेका मी?)
'डु यु नो मराठी?'
'नो मॅम, आय कॅन ओन्ली अंडरस्टँड लिटल बिट ऑफ इट.कान्ट स्पीक.'
(अरे फुल्या फुल्या फुल्या, चुल्लूभर पानीमे डूब मर! मला इंग्रजी कामापुरती येत असली तरी इंग्रजीत कचाकचा भांडता येत नाही ना रे.त्याला मातृभाषाच बरी.'ओ, काय सर्व्हिस देता का झx मारता?' चा आवेश आंग्लभाषेत आणता येणारे का मला?)

पुढचा संवाद आंग्लभाषेतलाच,पण मूळ भांडणाची नीट मजा मिळावी म्हणून मराठीत देत आहे.
'मी अमुक तमुक, नंबर अमुक तमुक.मला आताच एस एम एस आला की मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस दिल्याबद्दल आम्ही तुमच्या शिलकीतून १५ रु. कापून घेत आहोत.'
'थांबा मॅडम, मी चेक करतो, होल्ड ऑन.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो'
(परत 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन')
'हॅलो'
'यस मॅम, आम्ही शोधले. ती सर्व्हिस रिक्वेस्ट तुम्हीच दिली आहे.'
'मी एअरटेल प्रीपेड घेतल्यापासूनच्या तीन वर्षात कधीही अशी सर्व्हिस रिक्वेस्ट दिलेली नाही.'
'पण आमची सिस्टम म्हणते की तुम्ही तशी रिक्वेस्ट दिली.'
(च्या xxx ! तुझी सिस्टम घाल चुलीत मेल्या.)
'अहो पण मी तशी रिक्वेस्ट कधीच नाही केली, तसा फोन नाही केला, अशी सर्व्हिस हवी का विचारण्यार्या फोनला हो उत्तर नाही दिले, आणि असा एस एम एस नाही केला, आणि अशा एस एम एस ला उत्तरही नाही दिले.'
(मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले टाकली नाहीत, मी ती उचलणार नाही.)
'हे बघा मॅडम, आमच्या सिस्टम मधे स्पष्ट दिसतं आहे की तुम्ही अशी रिक्वेस्ट केली होती.'
'मी पण स्पष्ट सांगते आहे की मी अशी रिक्वेस्ट कधीच नाही केली. ही तुमच्या सिस्टमची चूक आहे.'
'हे पहा मॅडम, याबाबतीत मी काहीच करु शकत नाही.'
'तुम्ही म्हणता ना मी रिक्वेस्ट दिली, मग ती कोणत्या तारखेला आणि कोणत्या स्वरुपात दिली याची माहिती द्या.'
'सॉरी मॅडम, ही माहिती आम्ही डिसक्लोज करु शकत नाही.'
(अरे चोरा! आमची माहिती बरी विचारुन घेतोस फोन केल्या केल्या..आणि स्वतः माहिती देताना मात्र प्रायव्हसी पॉलीसी होय?)
'हे बघा, मी स्पष्ट सांगते आहे की अशी सर्व्हिस मी कधीच मागितली नाही आणि ती रद्द करा.आणि मला १५ रु. परत द्या.'
'सॉरी मॅडम. १५ रु. तर परत मिळणार नाहीत.तुम्ही ५११ ला 'एम सी ए कॅन्सल' असा एस एम एस करुन कॅन्सल ची रिक्वेस्ट टाका.'
(वा हे बरं आहे. तुम्ही नको त्या सर्व्हिस न विचारता द्या..रद्द करताना मात्र आम्हालाच तसदी द्या.तुम्ही कचरा करा, आम्ही झाडू मारतो.)
'नक्की रद्द होईल का?'
'असं करा मॅडम, तुम्ही चोवीस तासांनी परत फोन करुन ती कॅन्सल झाल्याचं कन्फर्मेशन घ्या.'
(घेते रे..करते काय न घेऊन?पैसे माझेच जाणार ना दर महिन्याला? चूक माझी नसली तरी मला ती सुधारायला तडफडायला पाहिजेच.)
एम सी ए कॅन्सल..५११..सेंड.
'युवर रिक्वेस्ट विल बी प्रोसेस्ड इन नेक्स्ट ट्वेंटी फोर अवर्स.'
(अय्या! कित्ती छान! खरंच ना पण?)

२४ तासांनी.
९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.)
'हॅलो.'
'मी असा असा एम सी ए कॅन्सल चा एस एम एस केला. आणि मिस्ड कॉल ऍलर्ट सेवा खरंच कॅन्सल झालीय का?'
'थांबा हं मॅडम. मी चेक करते.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो मॅडम, ती सर्व्हिस अजून तरी कॅन्सल झालेली नाही, पण चोवीस तासात नक्की कॅन्सल होईल.'
'नक्की होईल का? की चोवीस तासांनी परत हेच म्हणणार?'
'नही, तुम्ही कॅन्सल रिक्वेस्ट टाकली आहे ना? नक्की कॅन्सल होईल.'

दुसरा महिना:
'रुपीज १५ डिडक्टेड फ्रॉम युवर अकाउंट. थँक यु फॉर युजिंग एअरटेल मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस.'
९८९००९८९००..
ब्लाब्लाब्ला..१ दाबा..२ दाबा..३ दाबा..
'हॅलो, मी अमुक तमुक, नंबर अमुक तमुक. मी मागच्या महिन्यात मिस्ड कॉल सर्व्हिस कॅन्सल चा एस एम एस केला होता आणि तुमच्या ग्राहक सेवेला फोन पण केला होता. त्यांनी सांगितले की ती रद्द होईल पण झाली नाही. या महिन्यात परत १५ रु.गेले.'
'थांबा हं मॅडम.मी चेक करतो.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो मॅडम, तुम्ही परत एकदा एस एम एस करा.'
'पण यावेळी नक्की रद्द होईल ना? आणि मागच्या वेळी रद्द होईल असे छातीठोकपणे सांगणारी तुमची प्रतीनिधी आता कुठे आहे?'
'आता हे काही मी सांगू शकत नाही.पण तुम्ही ५११ ला एस एम एस करा आणि चोवीस तासांनी एकदा फोन करा.'
परत एकदा एम सी ए कॅन्सल..

तिसरा महिना:
'१५ रु गेले आणि मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस वापरल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.'
(का? का? माझ्याच बाबतीत असं का?)
९८९००९८९००
'१ दाबा..२ दाबा..३ दाबा..७ दाबा..९ दाबा..'
'हॅलो ब्ला ब्ला ब्ला.फोन केला होता...ब्ला ब्ला ब्ला... अजून कॅन्सल झाली नाही. तुमचे लोक काय करतात? आणि एस एम एस करण्याशिवाय रद्द करण्याचा दुसरा मार्ग नाही का? आणि रद्द झाल्याचा किंवा न झाल्याचा एस एम एस का येत नाही? युवर रिक्वेस्ट विल बी प्रोसेस्ड विदीन २४ अवर्स असा एस एम एस दर महिन्याला येऊनही काहीच का होत नाही? असं किती महिने चालणार?प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी मला '२४ तासात नक्की रद्द होणार बघा' असं सांगून कटवणार.'
'हे पहा मॅडम. मागच्या महिन्यात तुम्हाला कोणी अटेंड केलं आणि काय सांगितलं ते मला माहिती नाही.'
'बाई निशा होती आणि पहिल्या वेळी अटेंड करणारा बाबा आसिफ होता'
'बरं. यावेळी तुम्ही एस एम एस करा. नक्की कॅन्सल होईल.'
यावेळी वैतागात बदल म्हणून कस्टमर सर्व्हिस ला ई पत्र पाठवले.
यांत्रिक उत्तरः 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.'
(ऑटो रिप्लाय..पलिकडचा माणूस इमेल वाचत नसला तरी त्याच्याकडून प्रोग्रामने पाठवलेले उत्तर मिळणार. 'एअरटेलकडून मला स्पर्धेत ताजमहाल बक्षिस मिळालाय. बक्षिस घ्यायला कधी येऊ?' म्हटले तरी 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.' उत्तर आणि 'हराxxx! हे मेल जो वाचेल त्याच्या नानाची टांग! मर मेल्या!' म्हटले तरी 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.'. उत्तर पाठवणार्या प्रोग्रामला तुमच्या अडचणींशी, आनंदाशी, दु:खाशी काही सोयरसुतक नाही.शिव्या दिल्या तर रागही नाही.आणि आतापर्यंत पाठवलेल्या ३ ईपत्रांना ऑटो रिप्लाय नंतर मानवी रिप्लायही नाही.ईपत्रे आपोआप 'स्पॅम फोल्डर' मध्ये पण जात असावीत एखाद्या प्रोग्रामने.हाय काय नि नाय काय! कोण तो वेडा सारखा तक्रारीची ईमेल करतोय? घर थंडीत बांधा रे त्याचं! यालाच 'विज्ञान: एक शाप' म्हणत असावेत काय?)

६ वा महिना..
'ब्ला ब्ला ब्ला..१५ रु गेले..कॅन्सल नाही झाली...'
'बरं. तुम्ही असं करा, यावेळी एम सी ए नो पाठवून बघा.'
एम सी ए नो.. ५११..
'हॅलो..ब्ला ब्ला..ब्ला..नाही झाले कॅन्सल..मेसेज फेल.'
'हे कोणी सांगितले? तुम्ही एम सी कॅन्सलच पाठवा.'
एम सी ए कॅन्सल.. ५११.. एमसीएकॅन्सल..५११..' 'एम सी ए नो'.. एमसीएनो..५११..२४ तासात रिक्वेस्ट प्रोसेस केली जाईल..'
'नक्की कॅन्सल होईल मॅडम.'
(कोण निर्बुद्ध xxxx गणंग घेतले आहेत रे कस्टमर सर्व्हिस मध्ये? दरवेळी 'अगदी नक्की' वाली आश्वासने देतात..दरवेळी काही करत नाहीत. मार्चमध्ये निशाशी बोलले, एप्रिल मध्ये आसिफशी बोलले,मे मध्ये सुरेशशी बोलले, जून मध्ये सिम्रनशी बोलले, आता अजून कोणकोण आहात ते या फोनवर. बोलून घ्या माझ्याशी.कॉल सेंटर मध्ये अमेरिकेतल्या माणसाशी मकरंदला मॅक होऊन आणि सविताला सॅली होऊन बोलावे लागते तसा कोणी विदेशी आयझॅक माझ्याशी आसिफ बनून बोलत नाहीये ना? का दरवेळी एकच आसिफ आणि एकच निशा वेगवेगळी माणसं बनून बोलत आहात?)

हा किस्सा गेले ७ महिना चालू आहे. दरवेळी 'एम सी ए कॅन्सल', 'एम सी ए नो' टु ५११..'नक्की रद्द होणार' ची आश्वासने.. 'कस्टमर सर्व्हिस' 'कस्टमर केअर' या गोंडस नावाखाली वावरणार्या या निर्बुद्ध अज्ञाताशी लढा देताना अस्मादिकांच्या तलवारी बोथट झाल्या आहेत. 'ग्राहक मंच' इ. माहित्या वाचून 'काही तरी केलं पाहिजे बुवा!' अशी स्फूर्ती येऊन दुसर्या क्षणी 'नको बाबा कोर्टाची पायरी!' म्हणून कच खाणे. 'काय बावळट आहेस. आयडीया सिमकार्ड घे.' ला 'मला फोन नंबर शक्यतो बदलायचा नाही' हे उत्तर, 'शंकरशेट रोड ला व्हेगा सेंटर ला जाऊन झापून या' वर 'व्हेगा सेंटर मध्ये जाऊन काचा फोडण्याची' स्वप्ने पाहणे, परत 'कस्टमर सर्व्हिस चे फोन व्हेगा सेंटरहून येतात की दुसरी कडून की बंगलोर की चेन्नईहून?' या अज्ञात शत्रूच्या ठिकाणाबाबतच्या शंकेने तलवारी गळून पडणे..
'जाऊदे मेलं. १५ गुणिले १२ म्हणजे १८० रु. जाऊदेत. पण हा दर वेळी मनस्ताप नको. हे पॅकेज संपल्यावर सरळ पोस्टपेड करुन टाकू नंबर तोच ठेवून.' असा भेकड विचार..
माझ्याकडे काय पुरावा आहे? ही माणसे 'मीच रिक्वेस्ट दिली' म्हणतात. मी कधीही कोणत्याही स्वरुपात दिली नाही हे मला माहिती आहे. पण माझ्याकडे मी ती दिली नाही याचे काय पुरावे आहेत? त्यांच्याकडे मी दिली याची काय पुरावे आहेत? असले तर सांगत का नाहियेत? हा काही स्कॅम आहे का? यात पूर्ण एअरटेल आणि एअरटेल ची डाटाबेस सिस्टम सामिल आहे का? दाद मागू कुठे? हे लचांड माझ्या मागे का लागावे? आता हे निस्तरायला कोणाला पकडावे? हे चोर एस एम एस पाठवूनही काहीच करत नाहीत हे कोणाला सांगावे?

'बसल्या जागी फोन करुन कामे होतात' हे सुख देणार्या ग्राहक सेवा खरंच सेवा आहेत का? काम नाही झाले तर प्रत्यक्ष अद्वातद्वा वचने देणार्या माणसांचे गळे पकडता येत नाहीत हा तोटा नाही का? समोरचा माणूस प्रत्येक वेळी वेगवेगळा असल्याने चुकीची माहिती देणार्याला ओळखता येत नाही हा तोटा नाही का? दरवेळी ऐकणारा माणूस वेगळा असल्याने आपले पूर्ण चर्हाट परत ऐकवावे लागणे हा तोटा नाही काय? 'बिचारे शिफ्ट मध्ये काम करणारे कॉल सेंटरवाले' अशी आश्वासने ड्रगच्या धुंदीत देऊन विसरुन जात असावेत का? पण सगळ्या ग्राहक सेवा अशा नसतात. सगळ्याच कॉल सेंटरमध्ये अनाचार चालत नाहीत..त्यांच्या आपल्या समस्या असतात..पण मग मला दर महिन्याला खोटखोटं सांगून पुढच्या महिन्यात १५ रु. जाईपर्यंत स्वस्थ का बसवतात?

कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी बरेचदा 'बाय हुक ऑर क्रुक' ने मोठे होणार्या या मोबाईल कंपन्यांबद्दल थोडी शंका येतेच. 'फटिचर, तू इतना सोचता क्यूं है रे?' असं म्हणून स्वतःला गप्प बसवते झालं.




अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे 




"अहो, ऐकलंत का? फीचे पैसे कधी मिळणार तुमचे? तुमच्या लाडक्या लेकीला
एकही धडका ड्रेस नाही.. तो घ्यायचाय आणि जरा भाजीही आणायची होती."
"आली होती पण खर्च झाली. आईला एमटी केलेत पैसे."
"खर्च झाली???!!! आईंना आत्ता गेल्याच महिन्यात तर एमटी केलेलीत ना
तुम्ही मग आता परत?"
"भाऊला लागत होते हातऊसने.."
"बास्स.. त्यांच्या उधळपट्टीला ठिगळे लावायला पैसे आहेत पण पोरांना कपडे
घ्यायला नाहीत पैसे.. इतक्या दिवसांनी आलेली ती मेली फी, तीही टाकलीत
देऊन आणि परत म्हणा मीच कर्कशा म्हणून.."
"माझ्याकडे नाहीयेत आत्ता अजिबात पैसे. कडधान्यं कर काही दिवस."
"बाबा, आईला का त्रास देता तुम्ही? पैसे असताना नाहीत असे सांगू नये."
माझ्या या मध्येच बोलण्याने दोघेही चमकले. बाबांचा पारा भलताच वर गेला..
"काय गं कार्टे, काय बडबडतेस? खोटं काय बोललो मी? पैसे नाहीचेत
माझ्याकडे..बघ हवे तर खिशात.."
"आहेत! खिशात नाहीत पण आहेत.."
"कुठे आहेत गं बबडे पैसे?" आई.
"त्या जड पुस्तकात! थांबा मी काढून दाखवते.." असं म्हणून मी खुर्ची आणून
त्यावर चढले. हात उंच करून अवकळा करकरून ते पुस्तक कसेबसे काढले.. त्या
पुस्तकाचे वजन माझ्या लहान हातांना खूपच जास्त होते! पुस्तक उलटे धरून
पानं फर्रर्र करताच एक १०ची नोट खाली पडली!
"आहे की नाही पैसे?!" माझा विजयीमुद्रेने प्रश्न.
"का हो? अजुन कुठेकुठे लपवून ठेवलेत तुम्ही पैसे?"
"अगं मला खरंच माहिती नाही ती नोट त्या पुस्तकात कशी काय गेली ते.
वाचतावाचता पान लक्षात ठेवण्यासाठी म्हणून ठेवली असेल वाचनाच्या धुंदीत
एखादवेळी. चला.. तुझ्या भाजीची तर सोय झाली. आता बबडीच्या ड्रेसचे बघू
काय ते नंतर.."
"मला ड्रेस नको.. आहे मला ड्रेस.."
बाबांच्या गालाला लगेच खळी पडली. "बघ.. लेक लाडकी का आहे कळले का? ती
म्हणतेय आहेत तिच्याकडे ड्रेस मग तू का मागे लागली आहेस माझ्या कधीची?"
"किती आणि कसे आहेत विचारा ना तुम्हीच.."
"??"
"शाळेचा गणवेश आहे की चांगला. बस्स झाला तेवढा मला."


कशी मुलगी पाहिजे?
तसा फारच सोपा वाटणारा प्रश्न आहे.

उत्तर तितकंच अवघड.

हा प्रश्न आम्हाला कोण विचारतं, कधी विचारतं त्यावर आमचं उत्तर अवलंबुन असतं.

म्हणजे आईनी रविवारी दुपारी मस्त आम्रस-पुरीचं जेवण झाल्यावर विचारलं की आमचं उत्तर असतं,

"असंच मे महिन्यात रविवारी दुपारी आम्रस-पुरी जेवायला घालणारी मुलगी पाहिजे."

पण जरा serious उत्तर द्यायचं झालं, तर आईला दाखवायला घरी घेऊन जाण्यासारखी ideal
पोरगी जशी असते - शांत, सोज्वळ ("सोज्वळ" अशा पोरी आणि पोरं आता अस्तित्वातच नसतात),
सगळ्यांशी मिळुन-मिसळुन राहणारी, घरातलं आणि बाहेरचं उत्तमरित्या सांभाळणारी, घरातल्या
थोरल्यांचा मान राखणारी, लहानांचे लाड पुरवणारी, सणासुदीला उत्साहानी पुढाकार घेणारी,
ई. हे सर्वोत्तम उत्तर असतं. थोडक्यात म्हणजे काय, ही मुलगी म्हणजे 'बायको कॅटेगरी'!

जवळच्या नातेवाईकांनी विचारलं की तेव्हा थोड्याफार फरकानी आईला दिलेलं उत्तरातली 'बायको
कॅटेगरी' उपयोगी पडते. हं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या लग्नात गेल्यावर आईच्या
मावशीच्या पुतण्याच्या आत्यच्या नव्वदीच्या पुढच्या सासुनी विचारलं तर जोरात त्यांच्या कानात
जाऊन म्हणायचं,

"घरातल्या देवाची पुजा तिनी मनोभावानी करायला पाहिजे, आणि रविवारी दुपारी जेवण
झाल्यावर आमच्या आजीचे पाय चेपुन द्यायला पाहिजे - अशी मुलगी मला हवी आहे!"

~"मिळेल हो, नक्की मिळेल!" असा आशीर्वाद हमखास मिळतोच!

मित्रांपैकी कुणी विचारलं की उत्तर 'बायको कॅटेगरी' (BC) वरुन 'अप्सरा कॅटेगरी' (AC) मधे
बदलतं. शेवटी लग्न करायचं असतं म्हणुन 'माल कॅटेगरी'तली मुलगी कितीही आवडली तरी लग्न AC
किंवा BC शीच करायचं असतं.

'अप्सरा कॅटेगरी' म्हणजे रोमन हॉलिडे मधली अतिशय ग्रेसफुल आणि रॉयल दिसणारी ऑड्रे हेपबर्न,
किंवा 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' अशा सुंदर खळीतुन प्रेमात पाडणारी प्रिटी झिंटा, किंवा
'पल, पल, हर पल' मधे आपल्याकडे हर पल प्रेमाच्या अपेक्षेने पाहणारी विद्या बालन!

चुकुन जर हे AC-वालं उत्तर आईला दिलं की,

"अरे! जमिनीवर उतर! स्वत:कडे पाहिलं आहेस का कधी आरशात? अरे, त्या फक्‍त सिनेमात असतात.
खरं आयुष्य खूप वेगळं असतं!"

सगळ्यात अवघड परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा एखादी मैत्रिण असा प्रश्न विचारते.
कशी मुलगी पाहिजे?
तिला पण बिन्दास्त AC-वालं उत्तर देऊन टाकायचं.
मित्राला 'AC' म्हट्लं की पटकन समजतं, पण मैत्रिणीला त्यातले बारकावे पाहिजे असतात.
मग ते बारकावे सांगीतले, की ती तिची कोण एक 'जवळची' मैत्रिण ती तुम्हाला सुचवते.
मग स्वत:हूनच सांगते,
'ती तशी छान आहे, पण अप्सरा नाहीये रे... साधीच आहे...' (म्हणजे तुमचा शोध पुन्हा सुरु)
किंवा
'अरे! अगदी अप्सरा आहे! ऐश्वर्याच!' (अशी शक्यता जवळ-जवळ शून्य असते - तुम्हाला भेटेपर्यंत
सलमान, विवेक नाहीतर अभिषेकचा नंबर आधीच लागलेला असतो)
म्हणजे एवढं सगळं करुन उपयोग काहीच नाही!! :-(((
अप्सरा आणि बायको कॅटेगरी दोन्ही वेगवेगळ्या असतात का?
Can I not have best of both the worlds?
आम्हाला कशी मुलगी पाहिजे?
1) सर्व प्रथम म्हणजे ती हुशार, confident आणि independent पाहिजे - ती कशी ओळखायची?
ह्या करता "हीथ्रो टेस्ट" वापरायची. समज ती मुलगी हीथ्रो एरपोर्टवर एकटीच मागे राहिली.
तर हीथ्रो वरुन तिला एकटं घरी येता आलं पाहिजे. मग आमचं घर लंडन मधे असो, मुंबई मधे असो,
किंवा झुमरीतलैय्या मधे! तिला तिथे एकटं येता आलं पाहिजे! म्हणजे ही टेस्ट करायाला आम्ही तिला
मुद्दामुन एकटं नाही सोडणार, पण मुद्दा हा आहे की ती तेवढी हुशार, confident आणि
independent पाहिजे.

२) दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिला मस्त चहा करता आला पाहिजे. स्वयंपाक जमला, नाही जमला तरी
चालेल. पण रोज सकाळी एक कप, आणि संध्याकाळी घरी परत आलं की एक कप असा तिच्या हातचा
बुंगाट चहा मिळाला, तर स्वर्ग-सुखच लाभलं असं समजायचं. आणि चहा बरोबर तिला मस्त गप्पा
मारता आल्या पाहिजेत!
३) आम्हाला लग्नात हुंड्यात ३ नव्या गाड्या पाहिजेत - एक काळी BMW, एक सिल्वर मर्सिडीज,
आणि एखादी तिच्या आवडीची - ह्या सगळ्या गाड्या Leo Mattel कंपनीच्याच पाहिजेत, आणि
आकार इतका मोठा पाहिजे की त्यातली प्रत्येक गाडी आमच्या तळहातावर मावली पाहिजे! म्हणजे
काय की आमच्या घरच्या शोकेस मधे त्या गाड्या पार्क करता येतील. शोकेस मधे आमच्या
बालपणातल्या इतर गाड्या आहेत, आणि आताच्या जगात पार्किंगच्या जागेचा इतका अभाव आहे,
त्याला आम्ही तरी काय करणार?

४) आवडतं पुस्तक आणि सिनेमाबद्दल विचारलं की तिनी पहिलंच उत्तर 'प्राईड आणि प्रेजुडाईस'
आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सोडुन काहीही सांगितलेलं चालेल. "चंपक / चांदोबा" आणि
"डॉक्टर कोतनीस की अमर कहानी" हे उत्तर पण चालेल! अहो, जशी आमची अप्सरा अस्तित्वात
नाही तसाच तो जेन ऑस्टेनचा "मिस्टर डार्सी" आणि शाहरुखचा "राहुल" फक्‍त पुस्तकात किंवा
सिनेमा विश्वातच सापडतो हो!
५) तिला आमचं टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल ह्या खेळांबद्दलचं असीम प्रेम चाललं पाहिजे
- तिला पण हे खेळ आवडत असतील, तर उत्तमच! खेळता येत असतील तर absolutely nothing
like it!
६) तिला फ्रेंच येत असेल तर लई भारी, कारण फ्रेंच इतकी romantic भाषा नाही. आमच्या
तुटक्या-फुटक्या फ्रेंचचे शब्द तिला एखाद्या शायरी किंवा प्रेमगीतातले भासले पाहिजेत. अहो शेवटी
म्हणतात ना,
"nothing else, but an honest intent matters".
७) आम्हाला salsa, jive हे नृत्य प्रकार येत नाहीत, पण शिकायची तीव्र इच्छा आहे. तिला
येत असेल, तर आम्हाला शिकवायचं, किंवा आमच्या बरोबर शिकण्याची तयारी पाहिजे. नाहीतर
आमचा भगवान स्टाईल गणपती डान्स चालला पाहिजे.
८) हिंदी सिनेमा बद्दलचं आमचं अफाट वेड तिला पटलं पाहिजे. अमिताभ, राहुल देव बर्मन, रेहमान
, गुल्जार, किशोर हे आमचे दैवत आवडत नसतील तर निदान बघायची/ऐकायची तयारी पाहिजे.
अधुन-मधुन आम्हाला गोविंदा आणि हिमेश पण आवडतो. (आधीच सांगितलेलं बरं!)
९) आमचं आयुष्यभराचा एकमेव मौल्यवान खजिना म्हणजे आम्ही बालपणापासुन जमवलेली पुस्तकं. आमच्या
खोलीतल्या प्रत्येक कपाटात, बॅगेत, पलंगाखाली, डेस्कवर, बॉक्स मधे, माळ्यावर, फरशीवर, नजर
जिथे जाईल तिथे आमचा खजिना पसरलेला आहे. त्या खजिन्याबद्दलचं आमचं प्रेम तिला पण असावं,
नाहीतर "काय ही रद्दी जमा केली आहे" असले विधान आम्ही खपवुन घेणार नाही.
१०) सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही पत्रिका पाहतो. आम्हाला मुलगी फक्‍त
"हास्य" राशीची पाहिजे. आणि तिचा रक्‍तगट कोणताही असु दे, पण attitude मात्र 'B+'
पाहिजे.

चला, आजच आमच्या मातोश्रींना ही १० गुणांची यादी आम्ही कळवतो. म्हणजे त्यांना शोधायला
बरं. आणि तुमच्या पैकी कोणाला ह्या "अप्सरा + बायको" कॅटेगरीत मोडणारी एखादी मुलगी
माहिती असेल, तर आम्हाला त्वरीत कळवावे, म्हणजे पुढच्या बोलणीला सुरुवात करता येईल.

तो पर्यंत आम्ही गुल्जार भाईंच्या नविन गाण्यावर झूम बराबर झूम करत बसतो,

धागे तोड लाओ चांदनी से नूर के,
घुंघट ही बना लो रौशनी से नूर के,
शर्म आ गयी तो आघोष में लो,
हो सांसों से उलझी रहें मेरी सांसें,
बोल ना हलके, हलके
बोल ना हलके, हलके...!!!!!!!!!!!!!!
 









पांघरूणातून दिवसाचा प्रकाश आत शिरला, तेव्हा ती चमकून जागी झाली. पांघरूण भिरकावून ती ताडकन उठून बसली. गजराच्या घड्याळावर थपडा देत तिनं दोन-चार सणसणीत शिव्याही घातल्या त्या घड्याळाला. 'जाम दगा द्यायला लागलंय हे घड्याळ. आता किमान तासभर लेट झालाय. आता आवरायचं कधी, नाश्ता कधी करायचा आणि ट्रेन कशी गाठायची?' तिच्या डोक्यात हजार चिंतांचा स्फोट झाला. ते नतदष्ट घड्याळ उचलून खिडकीतून भिरकावून द्यावं की फुटबॉलसारखं लाथाडून त्याचा चुराडा करून टाकावा, अशा क्रूर विचारांच्या दुविधेत ती असतानाच बेडरूमच्या दारावर 'टक् टक्' झालं... दार उघडून तो आत आला आणि त्याला पाहून ती चाटच पडली. त्याच्या हातात चक्क ट्रे होता. ट्रेमध्ये गरम, वाफाळत्या चहाचा कप, कुरकुरीत भाजलेले बटर टोस्ट आणि 'सनी साइड अप' ऑम्लेट! 'माय माय!' ती आनंदाश्चर्यानं चित्कारली. त्यानं खास बबजीर् छाप कुनिर्सात करून 'गुडमॉनिर्ंग मादाम' असं विश केलं आणि 'एनीथिंग एल्स मादाम!' असं अतिशय विनम्रतेनं विचारलं. त्याच्या त्या अदाकारीमुळे तिला क्षणभर सगळ्या जगाचाच विसर पडला. उशिराची जाग, ऑफिसला लेट होणार वगैरे सगळ्या विवंचना काही क्षण मागे पडल्या आणि ती ब्रेकफास्टवर तुटून पडली... 

... मस्तपैकी ढेकर देऊन तिनं चहाचा शेवटचा घोट संपवला. ट्रे क्षणार्धात उचलून त्यानं बाजूला ठेवला आणि विचारलं, 'काय, हाऊ वॉज द टी?' 

' फँटास्टिक! आणि ऑम्लेटसुद्धा ग्रेट होतं!' 

' थँक यू! आणि टोस्ट बरोबर भाजले गेले होते का?' 

' अरे, एकदम परफेक्ट!' 

' ही चव लक्षात राहील ना पक्की!' 

' ऑफकोर्स हनी!' 

' आणि ब्रेकफास्ट र्सव्ह करण्याची पद्धत!' 

' ती तर फारच स्वीट होती!' 

... अचानक त्याचा स्वर बदलला. रूक्ष, कोरड्या आणि व्यवहारी सुरात तो म्हणाला, 'हं! हे सगळं नीट लक्षात ठेव. गेले कित्येक दिवस मी तुझ्या हातचा ब्रेकफास्ट खातोय, पण, त्यात काहीतरी कमतरता वाटत होती. शेवटी ठरवलं, आपणच एकदा करून दाखवूयात. नाऊ प्लीज रिमेंबर ऑल ऑफ धिस आणि उद्यापासून एक्झॅक्टली अशाच पद्धतीनं मला ब्रेकफास्ट र्सव्ह झाला पाहिजे!' 

त्याच्या शब्दाशब्दागणिक तिचे डोळे पाण्यानं भरत चालले होते. चेहरा लालबुंद झाला होता. गळ्यात हुंदका दाटला होता. आता रडू फुटणार इतक्यात त्यानं तिच्या डोक्यावर एक टप्पू मारला, छान हसत तिच्या गालावर ओठ टेकवून तो म्हणाला, 'ए वेडाबाई! तो जोक होता.




With Lots Of Love
Sachin Haldankar.









एक छानशी गोष्ट

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!." 

Make a Free Website with Yola.