खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि
मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि
दुर्गुण इकडे तिकडे फिरत होते. काय करावे हे न कळल्याने कंटाळले होते.
एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना
खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते' ला एक कल्पना सुचली. ती
म्हणाली, "आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली.
लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्या मागे
लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता
दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला,........
एक, दोन, तीन..............
वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण
लपायला गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह'
कचऱ्याच्या ढिगात लपला. 'आपुलकी' नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल.
'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं.
प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला. 'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी
लपली. 'लोभ' एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला.
वेडेपणा आकडे मोजतच होता...... ७९, ८०, ८१, ८२......
बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून
'प्रेम' मात्र कुठे लपाव याचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं.
अर्थात आपल्याला याचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि,
'प्रेम' लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच... ९५, ९६, ९७....
शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा' ने
एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला. "मी येतोय!
मी येतोय!"
'वेडेपणा' न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या
पायाशीच त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्या एवढा उत्साह आणि
शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली.
तळ्याच्या तळातून त्याने 'खोटेपणा' ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून
'वासना' शोधून काढली. एकापाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध
लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात
'मत्सरा' ने, त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या
'वेडेपणा' ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या
गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय". 
'वेडेपणा' ने एक लाकडाचा धारदार ढलपा
घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा.
शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्या फटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा' ने
त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वर केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू? प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता
दाखव." तेव्हापासून प्रेम आंधळ झालं आणि वेडेपणा त्याचा नेहमीचा सोबती झाला.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


 या  विश्वासाच्या  बळावरच  आज  जागी  आहे  देवा .
                  तुझ्या  या  बोलण्यावरच  आज  केली  आहे  सेवा ..
                  
                                              काय  करू  एक  माणूस  आहे  मि ..
                              तुझ्या  इतका  नाही  कळला  कधी  मला ..
                                                                                   
                                                                                   म्हणून  आले  आज  दारी  तुझ्या  देवा ..
                                                                                             भरून  दें  झोळी  आज  पसरवली  तुझ्या  पाया !

साभार  कवीयेत्री - रुची

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.

तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.

तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.


एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''

""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.'' 

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस...  यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''


वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.

आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.

दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.

आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा. 
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

आयुष्य म्हणजे नेमक काय याचा विचार केला तर जाणवत की, लॉटरीच तीकीटच की..! गावी शेजारी एक अशिक्षित आजोबा राहतात. आजोबा प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला १ रुपयाचं लॉटरीच तिकीट विकत घेतात. बक्षिसाची रक्कम असते १५ लाख रुपये. दर महिन्याच्या १५ तारखेला लॉटरीच्या... टपरी वर जाऊन लॉटरी लागली का ते पाहतात. लॉटरी लागली नाही तरी येताना पुन्हा १ रुपयाचं तिकीट घेऊन येतात. आजपर्यंत १० वर्ष झाली. पण एकदाही आजोबाना लॉटरी लागली नाहीये. 

  
एकदा न राहवून मी विचारलं "आजोबा...कशाला खर्च करता लॉटरीवर...! इतक्या वर्षात एकदाही लागली नाहीये....!" आजोबा मंद हसले...आणि म्हणाले .."बाळा..लॉटरी लागावी म्हणून मी तिकीट नाही कधी काढत..१ तारखेला लॉटरीच तिकीट काढला की १५ तारखेपर्यंत मी मला १५ लाख मिळाले तर काय काय करेन याची स्वप्न पाहतो. १५ तारखेला लॉटरी लागली नसली की पुन्हा १ रुपयाचं तिकीट काढतो..आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत स्वप्न पाहतो...! असा २ रुपयात माझा प्रत्येक महिना छान जातो...! बाळे ही स्वप्नच मला जगायची उमेद देतात......!" " स्वप्नात मी आज्जी बरोबर सगळे देश फिरून येतो...रोज सकाळी लंडन मधे तर रात्री पॅरीसच्या टॉवर वर आम्ही कॉफी घेतो...जिवंतपणी आजीला कधी मुंबईला पण नेऊ शकलो नाही..पण आता मात्र तिला सगळीकेडे नेतो...तिला हवा ते घेऊन देतो...कालच मला म्हणाली की जीन्स ची पॅंट आणून द्या...! " "दुसर्याना त्रास न देता मनातल्या मनात स्वप्न बघितली तर काय वाईट ...? " 

मी म्हणाले..."आजोबा पण स्वप्न मोडली की त्रास नाही का होत...?" 

आजोबा म्हणाले.."अगो..मग लॉटरी लागेपर्यंत वाट पाहायची आणि वाट पाहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून नवीन स्वप्न बघायची...२ रुपयात..महिना छान घालवायचा..."

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

एकदा एक प्रवासी जोडपे एका बसमधून पर्वतीय प्रदेशातून प्रवास करीत होते. बराच 
प्रवास केल्यावर एका ठिकाणी त्यांनी बसमधून उतरण्याचा निर्णय घेतला. ते प्रवासी 
जोडपे उतरल्यावर बस पुन्हा सुरु झाली आणि आपल्या मार्गाला लागली. काही अंतर 
गेल्यावर त्या बसवर डोंगरातून गडगडत येणारा एक मोठा दगड पडला आणि त्याने बसमधील 
सगळ्या प्रवाशांचा मृत्यू ओढवला. हे दृश्य पाहून त्या बसमधून उतरलेल्या प्रवासी 
जोडप्याने म्हटले,.......अरेरे ! हे काय झाले. आम्ही त्या बसमध्ये असतो तर बरे 
झाले असते.........

तुम्हाला काय वाटते, त्या जोडप्याने असे का म्हटले असेल?..........

जरा डोके खाजवा ............

काय म्हणता डोके चालत नाही.

अरे ! अशी हार मानू नका.........

थोडे आणखी प्रयत्न करा. उत्तर नक्की सापडेल.

काय म्हणता उत्तर सापडत नाहीय.

ठीक आहे

उत्तर आहे..........


जर का ते जोडपे उतरण्याऐवजी त्या बसमध्येच असते, तर त्याना जो उतरण्यासाठी वेळ 
लागला तो न लागता, बस न थांबताच तशीच पुढे गेली असती. परंतू तसे न होता, बस 
त्यांना उतरविण्यासाठी काही वेळ तेथे थांबली. त्यामुळे झाले काय की तिला थोडा 
वेळ लागला. हा जो मधला वेळ होता तो ती बस तेथे त्यांना उतरण्यासाठी थांबली नसती 
तर लागला नसता. म्हणजेच ती बस दगड पडण्याच्या वेळी तेथे नसती. ती काही अंतर 
पुढे गेलेली असती. आणि म्हणूनच हा अपघाताचा प्रसंग आलाच नसता.

याचाच अर्थ असा की जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि दुस-यांना मदत 
करण्यासाठी सदैव तत्पर रहा.

जीवनामध्ये बरेच वेळा यशाच्या विरोधी अपयश नसून, हाती घेतलेले कार्य अर्धवट 
सोडून जाणे असते. (म्हणजेच पलायन होय.)

विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.

काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा, 
झटापटी करा आणि त्या घडवून आणा.

तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका. तुम्ही तुमची स्वत:ची 
किंमत स्वत:च निर्माण करा!!!


तो आणि ती 
- एक  सुंदर प्रेम कथा



(सकाळ मध्ये आलेल्या विजय लाड यांच्या तो आणि ती या लेख मालेतील  काही लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.)

पहिल्या 'प्रपोज'चा पहिलाच गंध
पहिलं हे पहिलंच असतं, असा आपण वारंवार उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊ या.



एव्हाना त्यांची मैत्री वर्गातल्या बाकापासून कॅंटीनच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात कॅंटीनचा कडवट चहा गळ्याखाली ढकलण्यासाठी काही तरी कारण अकारण पुढे करावे लागत असे. मग गप्पा-गोष्टी आणि टिंगलटवाळकीच्या निमित्तानं एकमेकांशी एखाद-दुसरा संवाद साधला जाई, तर कधी कधी वादविवाद झडे. असे दिवसांमागून दिवस जात होते. तो आज "प्रपोज' करील, उद्या करील, परवा करील, अशा भाबड्या आशेला कुरवाळत ती येणारा प्रत्येक दिवस ढकलत होती. पण "तो' सोन्याचा दिवस काही केल्या उगवत नव्हता. तशीच मनाची घालमेल काही केल्या शमत नव्हती. शेवटी भावनात्मक कोंडी फोडण्यासाठी तिने स्वतःच "प्रपोज' करण्याचा चाकोरीबाहेरचा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला.

तसेही ती काही अशोकाचं झाड नव्हती; ज्याला फूलही नाही, सावलीही नाही की फळंही नाही! एकविसाव्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये, हे शक्‍य तरी आहे काय! तशीही ती स्वभावाने खूप नम्र आणि संकोची मुलगी नव्हती. मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी एका दिव्यातून जावे लागेल, याचा तिला पुरेपूर अंदाज होता. त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती. "कल करे सो आज, और आज करे सो अब,' या उक्तीप्रमाणे तिने उद्याच प्रपोज करण्याचे ठरविले.



पहिल्या अर्थात पहिल्या आणि शेवटच्या प्रपोजची मनात थोडी धाकधूक होतीच. तो "हो' म्हणेल की ..!' याचा राहून-राहून मनात विचार येत होता. गुलाबाच्या पाकळ्या तोडून झाल्या, गणिताच्या वहीची पानं मोजून झाली, तरी विश्‍वासक आणि थोडे आश्‍वासक उत्तर काही सापडेना. शेवटी थेट त्याच्यासमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. पण तिला पठडीबाज प्रपोज करायचे नव्हतं. काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.

त्यामुळे थेट, पण थोड्या वेगळ्या धाटणीच्या प्रपोजचा सराव करण्याचा विचार मनात डोकावला. रात्री बळेबळे चार घास खाऊन ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून आरशासमोर पंधरा-वीस वैविध्यपूर्ण प्रपोज मारले. त्यांतील एका वाक्‍याचा दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. प्रपोजमध्ये थोडी सुसूत्रता येण्यासाठी जे म्हणायचे आहे, ते नीट लिहून परत सराव केला. तरीही समाधान झाले नाही. प्रपोज सत्राच्या मध्यंतरी थोडा विरंगुळा म्हणून आकाशाला हात टेकवून एक-दोन गाण्यांच्या मधुर चालींवर पाय थिरकायचे. सर्व करून झाले; पण त्याला थेट प्रपोज करण्याची हिंमत नसल्याची तिला सारखी जाणीव होत होती. त्यापेक्षा प्रेमपत्र लिहून भावना व्यक्त करणे जास्त सोईस्कर वाटले. त्याने तिची गणिताची वही मागितलेली होतीच. उद्या ती देताना त्यात प्रेमपत्र ठेवण्याचा बेत तिने रचला. पत्राच्या प्रस्तावनेतच सकाळचे तीन वाजले; नंतर चारचा अर्धा ठोकाही पडला. शेवटी मोजून चार ओळीचे; पण भावनांनी ओतप्रोत भरलेले पत्र फायनल केले. ते सहज दिसेल अशा जागी वहीत लपवून ठेवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बागेतले एक ताजे, टवटवीत गुलाबाचे फूल पत्राच्या शेजारी ठेवले. पहिले दोन तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व्हरांड्यात जमा झाले. ती त्याचा जवळ जाऊन म्हणाली, ""मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.'' तो म्हणाला, ""मलाही!'' दोघेही कॅंटीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. या गोंधळातच तो तिला थेट म्हणाला, ""तुझे माझ्यावर प्रेम आहे?'' ती थोडी दचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन "नाही' म्हणाली. असे काही घडण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्‍न केला, "तुझे आहे काय?' आता तिने नाही म्हटल्यावर माझे तुझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, असे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यात मैत्री गमावण्याची रिस्कही होती. पण त्याला "नाही' म्हणताच आले नाही. त्याने "लिटल बिट' म्हटले.

तिला काहीच कळाले नाही. तिने परत विचारणा केली. तर तो नजर झुकवून अपराधी भावनेने "हो' म्हणाला. तो पुन्हा पुटपुटला, ""तू विचार करून उत्तर दे ना. माझ्यासाठी थोडा वेळ घे.'' हुकमी पत्ता आपल्या हातात ठेवत ती, ""ठिकै, उद्या सांगते'' म्हणाली. वही तशीच हातात घेऊन आनंदाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मनाने वर्गात परतली. त्याच्याप्रमाणेच तिलाही काही तरी "महत्त्वाचे' सांगायचे होते, याचा त्याला पुरता विसरच पडला.

प्रेम हे प्रेम असतं...'


रात्रीची नीरव शांतता. तो आपल्या खोलीत कॉटवर पाय दुमडून गाढ विचारात बसलाय. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. तास सरला की ठोक्‍यांच्या कर्कश आवाजाने त्यांची तंद्री भंगते, ती काही क्षणांसाठीच. पुन्हा तो विचारांच्या दरीत लोटला जातो. आपोआप. भावना व्यक्त केल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसत असलं तरी ती "हो' म्हणेल की "...' हा प्रश्‍न त्याला छळतोय. ""मुलीसुद्धा ना... एक "हो' किंवा "नाही' म्हणायला किती वेळ घेतात. दुसऱ्याची परीक्षा घेण्यात यांना फारच आवडतं. आमचा येथे जीव जातो. हे त्यांना कसं कळत नाही!'' तो स्वतःशीच बडबडत होता. उद्या कॉलेजात गेल्यावर तिला थेट विचारावं, असा मनात तो पक्का निर्धार करतो.



दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला येतच नाही. तो दिवसभर कॉलेजच्या पार्किंगमध्ये तिची वाट पाहत घुटमळत असतो. पण पदरी निराशाच पडते. शेवटचा तासही सरतो. आता त्याच्या धीराचा बांध फुटतो. तो तिच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतो. फोन फिरवतो तर "नॉट रिचेबल.' आता काय करावे! तो हतबल होतो; पण नाउमेद होत नाही. शेवटी पडल्या चेहऱ्याने बिछान्यात गुडूप होतो. ती का आली नसेल, तिला राग तर आला नसेल ना, असे अनेकानेक प्रश्‍न मनात रुंजी घालत असतात. तिसरा दिवस उगवतो. तो पुन्हा पार्किंगमध्ये तिची वाट पाहत उभा असतो. ती येते. गाडीला पार्क करून थेट त्याच्या दिशेने सरसावते. दोघेही न बोलताच जणू पूर्वनिर्धारित प्लॅनप्रमाणे कॅंटीनला जातात. कॉलेजचा पहिलाच तास असल्याने कॅंटीनमध्ये कमालीचा शुकशुकाट असतो. दोघेही गप्प असतात. केवळ त्यांच्या हृदयाची स्पंदने नकळत संवाद साधत असतात.

ती बोलती होते. म्हणते, ""मी तुझ्या भावनांचा आदर करते. तू स्वतःला निर्भीडपणे व्यक्त केलंस, याचा हेवाही वाटतो. या वयात अशा भावना मनात येणं स्वाभाविक आहेत. त्या व्यक्त करण्यातच त्याचं फलित असतं. काही मुलं घुम्या स्वभावाची असतात. मुलगी कितीही आवडली तरी व्यक्तच होत नाहीत. मुलगी बिचारी वाट बघत बसते. शेवटी त्याच्या मनात माझ्याबाबत काही नसेल, या निष्कर्षापर्यंत येऊन पोचते. अशात एखाद्या दुसऱ्या मुलानं "प्रपोज' केलं तर त्याचा भावनांचा आदर करीत केवळ त्याच्यासाठी "हो' म्हणते. मुलीला कधी कुणाच्या भावना दुखवता येत नाहीत. एखाद्या मुलाने "प्रपोज' केल्यावर एखादी मुलगी नकार देत असेल, तर त्यामागे काही छुप्या बाबी असतात. परिस्थिती त्यांना "नाही' म्हणण्यास भाग पाडते. तू मला "प्रपोज' केलंस याचा मला सार्थ अभिमान आहे.''



ती थोडी थांबून म्हणाली, ""दोघे प्रेमात पडले, गावभर गोंधळ घातला आणि शेवटी "ब्रेकअप' झाला असं सध्या प्रेमाचं स्वरूप आहे. मला तसं करायचं असतं, तर याआधीही अनेक मुलांनी मला "प्रपोज' केलं होतं. मी त्यांनाही "हो' म्हणू शकले असते. माझा तात्पुरत्या प्रेमप्रकरणावर विश्‍वास नाही. वय उथळ असलं तरी माझ्या भावना उथळ नाहीत. "ऍलुम्नी मीट'मध्ये वर्गमित्रांनी माझ्या प्रेमाबद्दल दबक्‍या आवाजात बोलावं, हे मी कधीही सहन करू शकणार नाही. मला त्यांच्यापुढे अभिमानानं मिरवायचं आहे. केवळ आजच नाही, तर शेवटच्या श्‍वासापर्यंत.''

ती बोलत होती, ""येत्या तीन-चार वर्षांत माझ्या लग्नाची बोलणी सुरू होतील. तुझं आणि माझं वय सारखंच असल्यानं या अल्पावधीत स्वतःला सिद्ध करणं तेवढं सोपं नाही. तरीही आपण मिळून काही प्रयत्न करू. त्यासाठी माझी सर्वतोपरी साथ तुला मिळेल. मी शब्द देते. तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझं वचन राहिलं. मी कुठेही कमी पडणार नाही. पण त्यासाठी हवाय तुझा जन्मभरासाठी मला साथ देण्याचा निर्धार. तो असेल तर तू माझा स्वीकार कर; अन्यथा मला फसविल्याचं पाप तुझ्या माथी लागेल. तू विचार करून उत्तर दे. मला काही घाई नाही. तू म्हणशील तोपर्यंत वाट बघण्याची तयारी आहे माझी. मला हवंय ते केवळ तुझं आश्‍वासक उत्तर. नीट विचार कर. माझ्यासाठी.''

त्याला तिचं बोलणं काही केल्या कळत नव्हतं. आता बॉल त्याच्या कोर्टात होता. ""मी उद्या सांगतो,'' असं म्हणून तो विषय संपवतो.

गुलाबी थंडीला प्रीतीची झालर!


पुन्हा एकदा रात्रीची भकास शांतता. खोलीत फक्त भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांची आणि त्याच्या हृदयाची हालचाल. बिछान्यावर पाय दुमडून तो विचार करतोय. थोड्या वेळात बाहेरच्या बोचऱ्या थंडीचं अस्तित्व खोलीतही जाणवायला लागतं. पाय झाकले जातील, तेवढंच पांघरूण घेतो. पुन्हा विचारचक्र सुरू. मणामणाचं ओझं मनावर घेऊन तळमळत बिछान्यावर थोडा पहुडतो. तरीही नजर शून्यात. अंतर्मनाचा वेध घेण्याच्या प्रयत्नात मनात एक अनपेक्षित द्वंद्व सुरू... ""एक निर्णयही किती महत्त्वाचा असतो. तुमचं आख्खं आयुष्य पालटण्याची ताकद त्यात असते.

म्हणून तो विचार करूनच घ्यावा, हे समजत असलं तरी उमगत नाही,'' तो स्वतःशीच बोलत होता. त्यानं तिला वेळ मागणं, हे वरकरणी त्याला फारच अपराधीपणाचं वाटत होतं, पण पर्याय नव्हता. आयुष्यभराच्या "कमिटमेंट'वर सहज उत्तर देणं तितकं सोपं नव्हतं. त्यातही एकदा शब्द दिला, तर त्यासाठी प्राणही गेला तरी बेहत्तर, असा त्याचा मराठी बाणा. पण शब्द देताना थोडा विचार करून निर्णय घेण्याचा त्याचा लहानपणापासूनचा स्वभाव. त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना.



त्याचं एक मन म्हणालं, ""अरे, तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची त्या मुलीची तयारी आहे. ती तुझी आयुष्यभरासाठी साथ मागतेय. तिला केवळ टाइमपास करायचा असता, तर केव्हाच "हो' म्हणून मोकळी झाली असती, पण तसं नाही. एवढी समजूतदार मुलगी तुला शोधून सापडणार नाही. या मुलीनं तुला वास्तवाचं दर्शन घडवलं. शेवटी प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं "सेम' असतं, हेच खरं. तिला पहिल्यांदा बघितल्याबरोबर मनाने साद दिली. नुकत्याच आलेल्या एका इंग्रजी चित्रपटात दाखविलं आहे ना. परग्रहावरील प्राणी त्यांच्या वेणीसारख्या संवेदकाच्या माध्यमातून एकमेकांच्या संवेदना जाणून घेतात. आपल्याला देवाने "सिक्‍स्थ सेन्स' दिलाय. एखाद्याचे डोळे, चेहरा, स्वभाव आणि वागणूक बघून आपण आपलं मत बनवितो. यालाच दुसऱ्याच्या संवेदना, भावना जाणून घेणं म्हणतात. ती भावुक होऊन बोलत असताना प्रेमाचा साक्षात्कार होत होता आणि त्या प्रेमाच्या परतफेडीची निरागस आशा तिच्या बोलक्‍या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. डोळ्यांमध्ये जमलेल्या आसवांवरून ती तुझ्याबाबत किती हळवी आहे, याचा पुरेपूर अंदाज येत होता. यालाच कदाचित दोघांची "लिंक' लागणं म्हणत असावं. तसंही तू तिला बघितलं आणि ती तुला "क्‍लिक' झाली. "वुई मेड फॉर इच अदर', अशी मनाने साद दिली. ती तुझी वाट बघतेय. जा, पळत जा तिच्यापाशी.''

तर दुसरं मन म्हणत होतं, ""अरे, आई-वडिलांच्या स्वप्नांचा जराही विचार न करता एखाद्याला आयुष्यभराचं "कमिटमेंट' देणं खरंच योग्य आहे? आणि तू दिलेला शब्द पाळू शकला नाहीस तर? प्रेमात रममाण होण्यासाठी तिने तुझ्यात ऊर्मी जागविली. पण चाकोरीबाहेरचा विचार करणं फारच कठीण आहे. तिच्या निखळ, निःस्वार्थ आणि निर्मळ मनाला दुखविण्याचं दुःसाहसही तुझ्याकडून होणार नाही, हे खरं. पण जोखीम घेण्यासही मन धजावत नाही. तिच्या बोलण्यात पोरकटपणा नव्हता, तर एका समजूतदार मुलीने कोणताही आडपडदा न ठेवता परखडपणे आपलं मत मांडलं होतं. त्यामुळे तुझी भीती अनाठायी व अप्रस्तुत आहे. मात्र, विचार करून निर्णय घे. आणि एकदा विचार पक्का झाल्यावर त्यावर ठाम राहा.''

बऱ्याच विचारांती त्याने आपली मान होकारार्थी या अर्थाने हलविली आणि निर्णय घेतला. एकदम पक्का आणि झोपेच्या आहारी गेला.


दुसऱ्या दिवशी टवटवीत लाल गुलाबाचं फूल आणि तळहाताच्या आकाराची कॅडबरी घेऊन तो कॉलेजला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव तिने क्षणात टिपले आणि ती कमालीची लाजली. तिच्या गालावरची गोड खळी आणखीच खुलली. त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलाचा तिनं सुहास्य वदनानं स्वीकार केला. कॅडबरी जणू हिसकूनच घेतली. तो श्‍वास रोखून बघत होता. एक शब्दही न बोलता तिने एक चिठ्ठी दिली. त्यात गुलाबाचं कोमेजलेलं फूल होतं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्‍नांकित भाव उमटला. त्याने तिच्याकडे मान वळविली, तेव्हा ती म्हणाली, ""मी चार दिवसांआधीच चिठ्ठी लिहिली होती. तुझी थोडी परीक्षा घेतली. सॉरी. माफ कर. पुन्हा असं करणार नाही.''

तो चिठ्ठी उघडून पाहतो तर त्यात लिहिलं होतं...

चांदणी मी तुझी, चांद साक्षी नभी,
स्वामी हृदया, मी तुझी रे सखी,
नाव रे तुझे, कोरले हृदयी,
उच्चार स्मरे, प्रत्येक स्पंदनी.

"त्याने निर्णय घेतला. अगदी ठाम. तोही माझ्यासाठी. माझ्या हळव्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी. माझ्या सरळसोट बोलण्यानं तो कदाचित दुखावला असेल. थोडा चिडलाही असेल; पण माझी बाजू स्पष्ट मांडण्याविना पर्याय नव्हता. मला हातचं राखून वागण्याची सवय नाही. जे आहे, ते मी स्पष्ट करते. माझा स्वभावच आहेच तसा. त्याच्या निखळ, निःस्वार्थी, निर्मळ मनाचा वारंवार प्रत्यय येत होता. अनपेक्षित परिस्थितीचा सामना करताना तो थोडा डगमगेल, असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही. त्याने स्वतःला केवळ व्यक्तच केलं नाही, तर एक जबाबदारी स्वीकारली. अगदी मनमोकळेपणाने. मला असाच मुलगा हवा होता. विचार करून निर्णय घेणारा. दृढनिश्‍चयी. तसंही, if and is noble, then why to worry about means.. शेवट दोघांच्या मनासारखा झाल, यातच मोठं समाधान आहे...'' ती स्वतःशीच बोलत होती.


एक शिक्षण अधिकारी
एकदा एका शाळेत गेला
सहजच एका वर्गात शिरला,
एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला.
बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला.

"रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला
सारा वर्ग शांत शांत जाहला
प्रश्न् पुन्हा एकदा विचारला
"मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला


अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला -
"रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?"
मास्तरांनी खुलासा केला -
आमचा विद्यार्थी साधा भोळा
गांधी अहिंसा ठाऊक त्याला
कशाला कोण मारेल रावणाला ?
अधिकारी आणखी वैतागला,
मुख्याध्यापकांकडे गेला,
झाला प्रकार सांगितला,
"रावणाला कोणी मारला ?
विद्यार्थी सांगत नाहीत" - म्हणाला

मुख्याध्यापक म्हणाले -
"शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?";
"जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?" :-D :-D :-D 



एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. 
हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, 
`सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' 
तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; 
कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' 
हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, 
नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, 
तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया.
मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. 
तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.     

तात्पर्य : मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले ? 
मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते. 
रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता. 
म्हणूनच श्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता. 
आपणसुद्धा सेवा करायला पटकन पुढे आलो, तर देवाची लाडकी मुले होऊ.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी





सिंहाचं पिल्लू बघायला जंगलातले सगळे प्राणी जमले होते. सगळ्यांच्याच
डोळ्यांत खूप खूप कौतुक होतं...सिंह आणि सिंहीण तर छोट्या सिंहाच्या
आगमनानं हरखून गेले होते...एकमेकांच्या डोळ्यांत खोल बघत होते; जणू
त्यांना त्या पिल्लामध्ये स्वतःचं बालपण दिसत होतं...सिंह आणि सिंहीण
जंगलातल्या सगळ्या प्राण्यांशी, पक्ष्यांशी इतके मायेनं वागत की,
त्यांच्या आनंदात सगळं जंगल आनंदून गेलं होतं...
गुहेतल्या जुन्या-जाणत्या
सिंहांनी पिल्लाला आशीर्वाद दिले आणि जंगलातल्या सर्वांच्या साक्षीनं
काही ज्येष्ठ हत्ती, जिराफ यांच्याशी चर्चा करून पिल्लाचं नाव "अमर'
ठेवलं....सगळ्यांनी जल्लोष केला. माकडांनी झाडाच्या फांद्या हलवून फुला-
पानांचा सडा पाडला...सगळ्या पक्ष्यांनी किलबिलाट करून "अमर'चं स्वागत
केलं आणि आशीर्वादही दिले.




"अमर' हळूहळू मोठा होऊ लागला...सगळ्यांनी मिळून त्याला प्रत्येक गोष्टीत
तरबेज करायचं, असं ठरवूनच टाकलं होतं...चित्त्यांनी त्याला सुसाट
धावण्यात तरबेज केलं...उंटांनी त्याला जंगलाबाहेरील वाळवंटाच्या गोष्टी
सांगितल्या...हत्तीनं जुने अनुभव सांगून शहाणं केलं आणि बगळ्यांनी चार
युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. सिंह आणि सिंहीण यांनी तर प्रत्येक छोट्या
गोष्टीकडं बारीक लक्ष देऊन "अमर'ला शहाणं केलं आणि साऱ्या जंगलाचं बाळ
असणारा अमर आता सगळ्यांचा "अभिमान' झाला...




शक्तिवान, गुणवान झालेला तरणाबांड सिंह "अमर' एकदा फिरत फिरत दूरच्या
दुसऱ्या एका जंगलात येऊन पोचला...सुंदर फुलं, स्वच्छ निळंशार पाणी,
शांतता यामुळं "अमर' वेडा होऊन त्या जंगलात फिरत राहिला...तिथले प्राणी,
पक्षी यांनीसुद्धा गुणी, हुशार, बलवान असलेल्या "अमर'चं मनापासून स्वागत
केलं आणि घरच्या जंगलासारखाच तो या नव्या जंगलातही लोकप्रिय होऊ लागला...


"अमर' या नव्या जंगलात रुळला खरा; पण त्याला त्याच्या आई-बाबांची खूप
आठवण यायला लागली आणि इकडे आई-बाबासुद्धा त्याच्या परत येण्याची वाट पाहू
लागले...आई तर "अमर'च्या आठवणीत वेडीपिशी झाली; पण बाबाने तिला
समजावलं..."" "अमर'ला आठवण येत असेलच गं आपली; पण आपला अमर आहेच असा की,
तो जाईल तिथे इतका आवडेल सगळ्यांना की, त्या जंगलात त्याला आग्रहानं
ठेवून घेतलं असेल सगळ्यांनी...'' आणि "अमर'सुद्धा जुन्या जंगलातल्या
सोबत्यांच्या आणि आई-वडिलांच्या आठवणीनं खूप खूप रडायचा; पण त्याला नवीन
जंगलाचा आग्रहही मोडवत नव्हता.






एक दिवस जुन्या जंगलात आलेल्या हरणांच्या कळपानं बातमी आणली की, "अमर'ला
एक सिंहीण भेटलीए आणि त्यांना एक गोड गोड पिल्लू झालंय...या बातमीनं
"अमर'च्या आईचा बांध फुटला आणि...आणि...आणि...
""पुढे सांग ना आज्जी,'' ओम म्हणाला..""हॅलो...हॅलो आज्जी गं...सांग ना
गं..तुला दिसतोय का मी? आज्जी तो माईक जवळ घे आणि कॉम्प्युटरच्या
कॅमेऱ्यासमोर ये...त्याच्याशिवाय कशी दिसशील तू मला? 


मी इतक्‍या सकाळी
उठलोय ना रविवार असून ते फक्त तुझी गोष्ट ऐकायला. नाही तर अमेरिकेत
कोणीही रविवारी लवकर उठत नाही...सांग ना! आज्जी! पुण्यात थंडी आहे का हो
आजोबा? आजोबा, सांगा ना...''


""तुला किती वेळा सांगितलंय मी आई-बाबांची आणि पिल्लाची गोष्ट नको
सांगूस..पण नाही! दर वेळेला प्राणी बदलतो...कधी मांजर, कधी चिमणी, कधी
सिंह; पण गोष्ट तीच सांगतेस तू सुषमा'' अरुणरावांचा पारा चढला होता.


चिडण्यापेक्षाही त्यांना सुषमाला होणाऱ्या त्रासाची काळजी वाटत होती.
""नातू गोष्ट सांग म्हणतो आणि पुण्यातून तू चॅटिंग करताना दर वेळी रडतेस
कशासाठी? आपल्या मुलाचं आपल्यावर खूप प्रेम आहे, हे तुलाही माहितीए, मग
त्याच्या लांब असण्याचा किती त्रास करून घेणार आहेस तू...? आणि दरवर्षी
भेटतो की आपण...!''


""मी दर वेळेला तीच गोष्ट सांगते ना? मग दर वेळेला दारामागे उभे राहून
तीच गोष्ट दर आठवड्याला कशाला ऐकता? आणि मी मागे वळले की निघून जाता! वर
म्हणताय, मी रडते...मग शेजारच्यांच्या नातवाला रोज फिरायला का घेऊन
जाता...? एक दिवस तो गावाला गेला तर चार वेळा विचारून आलात, "कधी येणार
आमचा छोटा मित्र?' सांगा? आता का गप्प? तरी आपली मी गोष्टीतला चिमणा असो
वा सिंह...समजूतदार असतो म्हणून सांगते...''
""हॅलो, हॅलो, आजी-आजोबा, तुम्ही काय बोलताय? इतकं पटापटा मराठी नाही
समजत मला,'' ओम म्हणाला.


""अरे, आजोबा मला पुढची गोष्ट सांगत होते.''
""बरं झालं, सांगितली त्यांनी पुढची गोष्ट. आता पूर्ण सांगशील तरी मला
तू...दर वेळेला त्या "अमर'ला पिल्लू झालं की तू गोष्ट बंदच
करतेस...म्हणतेस, आजोबांना जेवायचंय आता...आणि पुढच्या रविवारी परत
पहिल्यापासून सांगतेस...सांग ना आज्जी! पुढं काय होतं?''
""पुढची गोष्ट मी सांगतो,'' टेनिस खेळून आलेला "अमर' म्हणाला, ""बाबा,
तुला माहितीए पुढची गोष्ट?''




""ओम येस...! मला माहितीए...''
""नव जंगल त्या "अमर'ला पकडून ठेवतं..."अमर'ला येते जुन्या जंगलाची आठवण!
आई-बाबांची आठवण! पण नवीन जंगलातले मित्र त्याला "थांब रे, थांब रे'
म्हणतात आणि तो थांबतो...पण एक दिवस "अमर'चं पिल्लू म्हणतं की, मला आजी-
आजोबांना रोज...सारखंसारखं भेटायचंय...त्यांच्या अंगा-खांद्यावर
खेळायचंय...मांडीवर बसून रोज गोष्टी ऐकायच्यात...त्यांच्याबरोबर फिरायला
जायचंय...''
मग "अमर' आणि त्याची सिंहीण म्हणते की, आता मात्र आपल्याला जुन्या जंगलात
जायलाच हवं...आपल्या पिल्लाला आपले जुने सोबती, जुने डोंगर, नद्या
दाखवायलाच हव्यात...''
आणि मग ते जुन्या जंगलात परत जायचं ठरवतात...अगदी लगेच...




सुषमाताई आणि अरुणरावांना समोरचा कॉम्प्युटर पुसट दिसायला लागला...ते
काही बोलणार इतक्‍यात, त्यांना पलीकडे संवाद ऐकू आला, 'ए बाबा! किती
मस्त, त्या पिल्लाला आजी-आजोबा भेटणार आता. ए बाबा, आजी नेहमी अर्धवटच
गोष्ट सांगते...त्या सिंहाच्या-अमरच्या-पिल्लाचं नाव काय असतं रे? '
""बाळा, ओम...ओम असतं अमरच्या पिल्लाचं नाव...! ओम!


- लेखक :सलील कुलकर्णी

 


नुकताच मी बारावी ला गेलो होतो , अन ती
अकरावी ला .
आमची ओळख तशी खास झाली नव्हती ,
नुसत आम्ही एकमेंकाना पाहत होतो . . .

आमच एकमेंकाना पाहन इतक वाढत गेल कि ,
आम्ही एकमेंकाना पाहिल्याशिवाय दिवस चांगला जातच नसे ,
दोघांच पाहन इतक वाढत गेल कि मला समजेना से झाले कि ही मैञी समजावी कि
प्रेम . . .


ती माझी प्रत्येक वस्तु व मिञ याच्यांवरुन ,
मला ओळखायची कि मी कुठेतरी जवळच आहे .
पण, मला समजत नव्हते कि मी तीला काय कारणाने
बोलू . . .

मी मिंञाच्या ग्रुपमध्ये असायचो व ती रोज पाहायची ,
एक हास्य देवून जायची अन
मिञांना समजत नसे कि ती कोणाकडे पाहायची
आणि,
आपले मिञच खरे शञु असतात न . . .


एके-दिवशी मिंञानी ओळखल कि ती कोणाकडे पाहते ,
व माझ्या तोंडून ही निघाल,
व मिञांनी आपले काम चालू केले ,
नोटीस बोर्डवर माझ अन
तीच नाव लिहायच ,
ती ते नाव वाचायची अन
गालातल्या-गालात
हसायची . . .


मी अचानक कॉलेजला जायचे बंद केल , व गावी निघून गेलो .
ती रोज मला शोधायची ,
रोजच मिञांच्या ग्रुपमध्ये पाहायची पण ,
मी तीला दिसलोच नाही ,
व मी काही दिवसांनी परत आलोतर तीने माझ्या मागे फिरायला चालू केली . . . पण
मला काहीच समजेना ही मैञी का प्रेम . . .


अन तीला अचानक कोठून कळाल काय देव जाने , कि
मी रोज देवळात जातो ,
व न येणारी ती रोजच संध्याकाळी देवळात यायला
लागली ,
तीच्या घरच्यांना ही थोंड समजल वाटतं . . .



व तीचे वडिल तीच्या बरोबर येवू लागले , 
तरी सुध्दा ती माझ्याकडे पाहायची 
व ती खुप आनंदीत होऊन हसायची ,
त्यामुळे , वडीलांना सार समजल 
तिच काय चाललयं . . .

तीच्या वडिलांनी तीचे बाहेर जाणे बंद केले ,
आणि ,
आमच्या दोघांचे एकमेकांना पाहणे बंद झाले ,
पण . ति मला विसरू शकत
नाही , व मी तीला . . .



आज , पण ती कुठे दिसली तर ,
ती गालातल्या-गालात हसते व तीला ते दिवस आठवतात ,
व ती माझ्याकडे पापनी न झाकता एकटक पाहतच राहते ,

पण , मला समजायचं राहूनचं गेल , कि
ही मैञी होती का प्रेम ????. . .
(This is real story)

साभार - लेखक
विनोद वधवानी
. . .vInOd . . .





























आज माझ्या लेकीची वार्षिक परीक्षा सुरु होणार होती. माझ्या सासूबाई तिला सहजच बोलून गेल्या कि, "जायच्या आधी देवाला नमस्कार कर म्हणजे देव तुला चांगली बुद्धी देईल. "
"आजी आज अस काय विशेष आहे कि मला आजच चांगल्या बुद्धीची गरज आहे? ती तर मला नेहमी लागणारच." माझी लेक म्हणाली.
"आग आज तुझी परीक्षा ना म्हणून म्हंटल." इति सासूबाई.
"हे बर आहे तुझ. आज कशाची तरी गरज म्हणून हात जोडायचे आणे मग गरज संपली कि विसरून जायचं. देवाला एक प्रकारे लाच देण मला नाही पटत."

लेकीच्या ह्या उत्तरावर मी मात्र खूप विचार करू लागले. मनुष्य स्वभाव कसा विचित्र आहे. गरज असेल तेंव्हा अगदी मन लावून आळवणी केली जाते आणि एकदा गरज संपली कि त्या देवाची आठवण पण राहत नाही. खरच अस का घडत असेल?
तसं पाहायला गेल तर आपल्या प्रत्येक कृतीचे चांगले वाईट परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतात. देव त्याच्यात काहीच मदत करू शकत नाही. हो फार फार तर हे परिणाम झेलायची ताकत देवू शकतो. 
यस मला माझे उत्तर मिळाले होते.

मला शाळेत शिकलेले भूमितीचे एक तत्व आठवले, कोणीही जड वस्तू उचलायची असेल तर ३ खांबांचा आधार लागतो. ह्या तीनही खांबांची उंची आणि आकारमान सारखेच असावे लागते. हे तीनही खांब जमिनीत एका योग्य कोनात आणि योग्य अंतरात रोवायचे असतात. ह्यातला एकही खांब जरी नीट उभा राहिला नाही किंवा वेगळ्या आकारमानाचा असेल तर वस्तू नीट उचलली जाणार नाही. जितकी वस्तू जड तितकी उंची आणि कोन अधिक.


अगदी तसंच कुठलाही निर्णय घेताना ३ खांब मजबूत असावे लागतात. पहिला खांब म्हणजे आपले ज्ञान, दुसरा खांब म्हणजे आपले संस्कार आणि तिसरा खांब म्हणजे शांत मन. हे तीनही खांब जर का मजबूत असतील तर आपल्या कृतीचा काहीही परिणाम होवो आपण तो सहज स्वीकारू शकतो.
माझ्या लेकीचे उदाहरण घेतले तर अस समजेल कि परीक्षेत जर का तिला चांगले मार्क मिळवायचे असतील तर उत्तम ज्ञान आवश्यक आहे. ते ज्ञान नसेल तर ती कदाचित काहीही लिहिणार नाही पण तिच्या वरचे संस्कार तिला कॉपी नक्कीच करू देणार नाहीत. पहिले दोन्ही खांब मजबूत असतील पण शांत मन नसेल तरी सुद्धा परिणाम शून्य. म्हणूनच असे काही करणे गरजेचे राहील कि तिला शांत मनाने परीक्षेला सामोरे जाता येईल.

हे शांत मन कोणाला देवाची आराधना करून मिळते, तर कोणाला एक सुरेल तान घेवून. तर कोणी छानसे चित्रच काढेल तर कोणी अजून काही तरी करेल. माझ्या मते जी कृती करून मनाला शांतता मिळते ती कृती म्हणजेच देवाचे एक रूप असते. म्हणूनच माझी आजी कदाचित म्हणायची कि देव हा सगळी कडे व्यापलेला आहे.

मित्रांनो मी माझ्या लेकीला समजावून सांगितलेला देवाचा अर्थ बरोबर कि चूक तुम्हाला काय वाटत?

साभार - लेखिका : राजश्री (पुणे  

Make a Free Website with Yola.